Friday, June 2, 2023
Homeब्रेकिंगसहा महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार...

सहा महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार : राजेंद्र पाटील- यड्रावकर

मी एक कार्यकर्ता आहे. २०१९ ची निवडणूक लढविताना जयसिंगपूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारणार, अशी ग्वाही मी शिरोळ तालुक्यातील जनतेला दिली होती. मी शब्दाला जागणारा कार्यकर्ता असल्यामुळे येणा-या सहा महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे पुतळे उभे केले जातील, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने क्रांती चौक परिसरातील एसटी महामंडळाच्या जागेची पुतळा उभारणीसाठी मागणी केली होती. गुरुवारी एसटी महामंडळाने संबंधित जागा जयसिंगपूर नगरपरिषदेकडे वर्ग केली असल्याचे मंजुरी पत्र दिले आणि शुक्रवारी डॉ. आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने या जागेवर भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आमदार राजेंद्र पाटील बोलत होते.

राजकारणाच्या वेळी राजकारण, पण विधायक कामाच्या वेळी एकत्र येण्याची परंपरा शिरोळ तालुक्याने अनेक वर्ष पाहिली आहे. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, शामराव आण्णा पाटील- यड्रावकर, खासदार बाळासाहेब माने, आमदार दिनकररावजी यादव, आमदार सा. रे. पाटील या मंडळींनी अनेक वर्ष शिरोळ तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. यांनीही राजकारण केले पण, विधायक कामात कधी एकमेकाला मागे खेचताना पाहायला मिळाले नाही. राजकीय संघर्ष त्याही काळात होता, परंतु तो काहीतरी चांगले करण्यासाठी होता. अलीकडच्या काळात चांगल्या कामाला सातत्याने आडकाठी आणण्याचे काम काही मंडळी करत आहेत. ही बाब वेदनादायी आहे. मागील दोन- अडीच वर्षांत जवळपास ९०० कोटी रुपयांचा निधी शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी आणता आला, याचा शिरोळच्या जनतेला आनंद आहे. परंतु केवळ राजकारण करू पाहणा-या मंडळींना याच्या वेदना होत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे, असेही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले, नियोजित पुतळ्याच्या जागेचे पूजन करून त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. स्वागत बी. आर. कांबळे यांनी केले. यावेळी जागा मंजूर झाल्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे उपाध्यक्ष विजय पवार यांचा पुतळा समितीच्या पदाधिका-यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. वाचत जाचाडीचे प्रमुख उत्तम वाघवेकर यांनी आभार मानले.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन हातळगे, संभाजी मोरे, युनूस डांगे, रविद्र ताडे, बजरंग खामकर, राहुल बंडगर, अर्जुन देशमुख, बाळासाहेब वगरे, महेश कलकुटगी, राजेंद्र झेले, दादासाहेब पाटील-चिंचवाडकर, शैलेश आडके, प्रेमला मुरगुंडे, वासुदेव भोजणे, कुमार हातळगे, मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, विजय खातेदार, सुरेश कांबळे, आनंदा शिंगे, जयपाल कांबळे, अब्दुल बागवान, डॉ. सुभाष सामंत, अभिजीत आलासकर, संजय शिंदे, वैजनाथ हिरवे, अमरदीप कांबळे, राजू मांजर्डेकर, हुसेन शेख, रजनीकांत कांबळे, सूर्यकांत कांबळे, बाळासाहेब कांबळे, जॉन सकटे, माधुरी आलासकर, सुनीता पवार, रेशमा गायकवाड, सुलोचना कांबळे, मल्हारी सासणे, सूरज शेळके, संतोष सासणे, शिवाजी कांबळे, वंदना हिरवे, संजय कुरुंदवाडे, मिलन कांबळे, सागर सासणे यांच्यासह आंबेडकरवादी विविध संघटनांचे प्रतिनिधी व जयसिंगपूरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group