Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनसामंथा आणि नागा चैतन्य विभक्त का झाले?; नागार्जुन यांनी सांगितलं कारण

सामंथा आणि नागा चैतन्य विभक्त का झाले?; नागार्जुन यांनी सांगितलं कारण

दाक्षिणात्य सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांनी त्यांचा मुलगा नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाविषयी मोठा खुलासा केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सामंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. दोघे वेगळे झाल्यानंतर अक्किनेनी नागार्जुन यांनी एका मुलाखतीत, ‘सामंथाला घटस्फोट हवा होता यामुळे ती कोर्टात गेली’ असे म्हटले आहे. सामंथाला नागा चैतन्यपासून घटस्फोट हवा होता. २०२१ मध्ये दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता, असेही नागार्जुन यांनी नमूद केले आहे.

अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही दक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी होती. ते एकमेकांपासून ऑक्टोबर २०२१ मध्ये विभक्त झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दोघे एकमेकांपासून का वेग‍ळे झाले याबाबत रोज वेगवेग‍ळे खुलासे समोर आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -