Friday, April 19, 2024
Homeआरोग्यविषयकतांब्याच्या भांडयात पाणी पिण्याचे 'आरोग्यदायी' फायदे

तांब्याच्या भांडयात पाणी पिण्याचे ‘आरोग्यदायी’ फायदे

भारतातील बरेच लोक तांब्यांच्या भांड्यांत ठेवलेले पाणी पितात. जाणीवपूर्वक तांब्याच्या भांडयाचावापर पाणी ठेवण्यासाठी केला जातो. तांबे आरोग्यासाठी हे फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेदात सांगितले जाते. यामुळे शरीराराला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

निरोगी शरीरासाठी आवश्यक कॉपर उत्कृष्ट मिनरलचे काम करते. ते शरीरातील लोहासोबत रक्त, प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. तांब्याच्या भांड्यात रात्रभर किंवा किमान 8 तास पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी रिकाम्या पोटी प्या सर्वाधिक चांगले असते.

तांबे पाणी शुद्ध करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. विज्ञान सांगते की, तांब्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करणारे अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. जेव्हा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवले जाते तेव्हा तांबे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया करते.

सांधेदुखी किंवा गुडघे दुखत असल्यास तांब्यामध्ये ठेवलेले पाणी रिकाम्या पोटी प्यावे. कारण तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरात वेदना निर्माण करणारी जळजळ दूर करण्यास मदत करतात , सांधे व गुडघेदुखीपासून आराम देतात.

शरीरातील चरबीच्या चयापचया क्रियेसाठी तांबे खूप महत्वाचे आहे. तांब्याचा वापर चरबीच्या पेशीचे रूपांतर उर्जेत रूपांतर करण्यासाठी केला जातो. त्यामुळे सकाळी-सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -