Thursday, September 19, 2024
HomeBlogSA vs IND | आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका, दोन स्टार...

SA vs IND | आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका, दोन स्टार बॉलर बाहेर, BCCI ने दिली माहिती

टीम इंडिया साऊथ आफ्रिका दौऱ्यावर असून टी-20 मालिका संपली आहे. तीन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. त्यानंतर 17 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे एक नाहीतर दोन बॉलर हे बाहेर झालेत. याबाबत बीसीसीयआयने अधिकृत घोषणा केलीये. मालिकेला सुरूवात होण्याआधीच टीममधील हुकमी एक्का असलेले बॉलर बाहेर झाल्यामुळे संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहेत ते दोन बॉलर?
साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेआधी संघाचा हुकमी एक्क असलेला मोहम्मद शमी याला वगळण्यात आलं आहे. कसोटी संघ जाहीर झाला तेव्हा शमीच्या फिटनेसवर त्याचा सहभाग अवलंबून असल्याचं सांगितलं होतं. शमीच्या फिटनेसबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. शमीच्या जागी बदली खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आलीय याबाबत बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूच्या नावाची घोषणा केली नाही.

रविवारपासून सुरू होणाऱ्या वन मालिकेमध्ये दीपक चहर याने आपलं नाव मागे घेतलं आहे. कुटंबातील खासगी कारणामुळे त्याने आपलं नाव मागे घेतल्याची माहिती सजमत आहे. दीपक चहरच्या जागी संघात आकाश दीप याचा समावेश केला आहे. त्यासोबतच श्रेयस अय्यर शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं बीसीसीआने सांगितलं आहे. पहिल्या कसोटीनंत श्रेयस कसोटी संघात सामील होणार आहे.

दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (C), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (VC), प्रसीध कृष्णा.

तीन वनडेसाठी भारताचा संघ: रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C&W), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

Previous article
Next article
राहुरी कृषी विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती प्रक्रिया, इच्छुकांनी लगेचच करा अर्ज राहुरी कृषी विद्यापीठात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक या पदासाठी ही भरती पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबात उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधीच म्हणाली लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आॅफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी याच्याकडून ही भरती प्रक्रिया राबली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती मालेगाव नाशिक येथील कॉलेज ऑफ अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी असणार आहे. उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण हे मालेगाव नाशिक असणार आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराला चांगलीच पगार देखील मिळणार आहे. उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावा. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. ऑफलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायची आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावी लागणार आहेत. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळेच लवकरात लवकर उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची फिजिकल एज्युकेशन या विषयात पीएच.डी असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाचे किमान पदव्युत्तर शिक्षण हवे. फक्त हेच नाही तर उमेदवार हा नेट/ सेट परीक्षी उत्तीर्ण झालेला असावा. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 डिसेंबर 2023 आहे. अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचावी. उमेदवारांना आपला अर्ज हा असोसिएट डीन, गव्हरमेंट कॉलेज ऑफ अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, आयकर कार्यालयासमोर, मालेगाव कॅम्प, मालेगाव, नाशिक येथे पाठवावी लागणार आहेत. चला तर मग वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -