Thursday, September 19, 2024
HomeBlogतब्बल १२ वर्षांनंतर सुर्य आणि गुरु निर्माण करणार ‘शक्तिशाली नवपंचम राजयोग’! ‘या’...

तब्बल १२ वर्षांनंतर सुर्य आणि गुरु निर्माण करणार ‘शक्तिशाली नवपंचम राजयोग’! ‘या’ राशींच्या लोकांचे उजळेल नशीब

तब्बल १२ वर्षांनंतर सुर्य आणि गुरु निर्माण करणार ‘शक्तिशाली नवपंचम राजयोग’! ‘या’ राशींच्या लोकांचे उजळेल नशीब
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्याच्या राशीतील बदलाचा निश्चितपणे १२ राशींच्या जीवनावर परिणाम होतो. यावेळी ग्रहांचा राजा सूर्यदेव गुरुची राशी धनुमध्ये स्थित आहे. दुसरीकडे, गुर ग्रह त्याच्या स्वतःच्या राशीत, मेष राशीत मार्गी अवस्थेत उपस्थित आहे. अशा स्थितीत सूर्य आणि गुरु त्रिकोण अवस्थेत असल्यामुळे ‘नवपंचम राजयोग’ तयार होत आहे. असा योगायोग तब्बल १२ वर्षांनंतर घडला आहे. वास्तविक, गुरु ग्रहाला पुन्हा एका राशीत परत येण्यासाठी १२ वर्षे लागतात. नवपंचम राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो.

मेष
मेष या राशीमध्ये गुरु पहिल्या घरात तर सूर्य नवव्या भावात स्थित आहे. अशा परिस्थितीत नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित करार आता पूर्ण होऊ शकतो. नोकरदारांनाही फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. अशा परिस्थितीत तुमच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. भाऊ आणि बहिणीसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. शैक्षणिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठीही हा राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने संपत्तीत वाढ होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. नोकरदार लोकांचे सहकाऱ्यांशी चांगले संबंध असतील. एकत्र काम करतील. अशा स्थितीत यश मिळू शकते. तुम्ही मित्रांसोबत पार्टी किंवा सहलीला जाऊ शकता. व्यावसायिकांनाही भरघोस नफा मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन करारावर स्वाक्षरी होऊ शकते. या सट्टेबाजी करणे किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते

वृश्चिक राशी
नवपंचम राजयोगाचाही या राशीच्या लोकांवर अनुकूल प्रभाव पडेल. कुटुंबासोबत संस्मरणीय क्षण घालवाल. यासोबतच तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कामानिमित्त सहलीला जावे लागेल. वैवाहिक जीवनात फक्त आनंद मिळेल. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांनाही फायदा मिळू शकतो. यासोबतच ज्येष्ठांच्या सहकार्याने अनेक क्षेत्रात यश संपादन करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -