अर्शदीपच्या दोन सलग याॅर्करवर दोन स्टम्पचे तुकडे पडले. त्यामुळे आयपीएलला सुद्धा मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेवटच्या षटकात अर्शदीपने सलग दोन चेंडूंवर मुंबईच्या दोन फलंदाजांना बाद केले.शनिवारी रात्री (22 एप्रिल) झालेल्या सामन्यात पंजाबच्या अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात दोन विकेट घेत मुंबईच्या तोंडचा घास काढून घेतला. अर्शदीपच्या दोन सलग याॅर्करवर दोन स्टम्पचे तुकडे पडले. त्यामुळे अर्शदीप सिंग मुंबईसाठी कर्दनकाळ ठरलाच, पण आयपीएलला सुद्धा मोठा आर्थिक फटका बसला आहे. एलईडी असलेल्या स्टम्प अत्यंत महागड्या आहेत. काही खेळाडूंचा तेवढा पगार सुद्धा नाही, एवढ्या त्या महाग आहेत.
आयपीएलमध्ये एलईडी स्टम्प वापरले जातात. या एलईडी स्टम्पच्या एका सेटची किंमत 25 ते 35 लाखांच्या दरम्यान आहे. त्याची किंमत वेगवेगळ्या देशांमध्ये बदलते. अशा स्थितीत अर्शदीपने दोन चेंडूंवर बॅक टू बॅक तुकडे केल्याने आयपीएलला किमान 50 ते 70 लाखांचे नुकसान झाले आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलक वर्माची पहिल्यांदा स्टम्प गुल केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर नेहल वढेराचा त्याच मार्गाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या बॅक टू बॅक विकेट्सने पंजाबने मुंबईच्या तोंडचा हिरावला. या सामन्यात पंजाबने मुंबईचा 13 धावांनी पराभव केला.
अर्शदीप सिंगकडून बॅक टू बॅक चेंडूवर दोन स्टम्पचे तुकडे, पण आयपीएलला लाखो रुपयांचा बांबू; अनेक खेळाडूंचा पगार सुद्धा तेवढा नाही!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -