Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे; 'या' जिल्ह्यांवर तिहेरी संकटाचे ढग

महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांवर तिहेरी संकटाचे ढग

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस, गारपीट होत आहे.

 

कडक उन्हाच्या झळा बसत असतानाच राज्यावर अवकळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. सध्या पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढत आहे. राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी 35 अंशाच्या वरपर्यंत तापमान पोहोचले आहे. मात्र हवमान विभागाने राज्याला अवकळी पावसाचा इशारा दिला आहे.

 

हवामान विभगाने राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासाह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे. हवामान विभगाने राज्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

आयएमडी म्हणजे हवामान विभागाने राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासाह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासाह पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यावर सध्या उष्णतेची लाट आणि जोरदार पाऊस आणि गारपीट असे तिहेरी संकट पाहायला मिळत आहे.

 

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याला अवकळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, लातूर , धारशिव, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

पाच दिवस राहणार पाऊस

 

ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात राज्यात कमाल तापमान ३५ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. बाष्पयुक्त वातावरण आणि तापमानवाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत, त्यामुळे पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

 

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यातही हलक्या पावसासह गडगडाट अपेक्षित आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -