Thursday, November 13, 2025
Homeमहाराष्ट्रउपोषणाचा पाचवा दिवस; सरकार दरबारी केवळ जोर ‘बैठका’; वातावरण तापणार की बदनामीला...

उपोषणाचा पाचवा दिवस; सरकार दरबारी केवळ जोर ‘बैठका’; वातावरण तापणार की बदनामीला मराठे शिस्तीने उत्तर देणार?

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणासाठी मराठा समाजाचा निकाराचा लढा सुरू झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणचा आज पाचवा दिवस आहे. त्यांनी दोन दिवसांपासून पाणी ही त्यागले आहे. तर आज त्यांनी वैद्यकीय पथकालाही परतावून लावले. सरकार दरबारी केवळ जोर बैठका सुरू आहेत. तर काही जण हायकोर्टाच्या माध्यमातून आंदोलनाला कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आंदोलनातील काही हुल्लडबाजांमुळे मराठा समाजाला बदनाम करण्याचाही प्रयत्न होत असल्याचे आंदोलक सांगत आहेत. सामान्य मुंबईकरांना वेठीस धरून मागण्या कशा पदरात पाडून घेणार असा सवाल ही करण्यात येत आहे. आज हायकोर्टात सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात सुनावणी होणार आहे. गेल्या दहा वर्षांतील आंदोलनाचा इतिहास पाहता मराठ्यांनी अभूतपूर्वी शिस्तीचे पालन केल्याचे दिसून येते. त्यामुळे आंदोलनातील हे घुसखोर शोधून त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन आंदोलकांसमोर आहे. तर हायकोर्टात हा मुद्दा गेल्याने सुंठी वाचून राज्य सरकारचा खोकला जाणार हे नक्की आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -