एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आईने ५ महिन्यांच्या पोटच्या पोराची हत्या केली आहे. या हत्येमागचे कारण ऐकून पोलिसांच्याही पायखालची जमीनच सरकली आहे. महिलेने खरच असे केले असेल का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण नंतर मोबाईल मधील चॅट्सने अखेर सत्य समोर आले आहे. महिला आणि तिच्या प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्या दोघींचीही चौकीशी केली जात आहे. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…
तमिळनाडूतील केलमंगलम येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने आपल्या ५ महिन्यांच्या मुलाची हत्या केली, कारण ऐकून कोणीही थक्क होईल. महिलेवर आरोप आहे की तिने मुलाला आपल्या महिला मित्रासोबतचे नाते तोडायचे नव्हते म्हणून मारले, आणि मूल तिला ओझे वाटू लागले होते.
तमिळनाडूतील केलमंगलम येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. २६ वर्षीय भारतीचे लग्न सुरेश नावाच्या व्यक्तीशी झाले होते. दोघांना दोन मुली आणि एक मुलगा होता. पण लग्न झालेले असूनही भारतीचे तिच्या परिसरातीलच एका तरुणी सुमित्रा (२२) सोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पती कामावर गेल्यावर भारती सुमित्राच्या घरी जायची. दोघींमध्ये इतके चांगले नाते होते की त्यांनी एकमेकांच्या नावाचे टॅटूही काढले होते.
मुलाच्या जन्मानंतर नाते बिघडू लागले
समोर आलेल्या माहितीनुसार, मुलाच्या जन्मानंतर भारती आणि सुमित्रामध्ये भांडणे वाढू लागली. सुमित्राला वाटत होते की मूल त्यांच्या नात्यात अडथळा आणत आहे. याच कारणावरून दोघींमध्ये अनेकदा भांडणे झाली. एक दिवस राग आणि बहकाव्यात येऊन भारतीने आपल्या मुलाचा गळा दाबला. नंतर तिने कुटुंबाला सांगितले की दूध पाजताना मुलाचे डोके आपटले आणि त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाने विश्वास ठेवला आणि मुलाचे अंत्यसंस्कारही केले.
मोबाईलने उघड केले सत्य
पण कहाणी येथेच संपली नाही. काही दिवसांनंतर भारतीचा पती सुरेशला तिच्या फोनमध्ये काही व्हिडीओ आणि फोटो सापडले, ज्यात भारती आणि सुमित्राचे खाजगी क्षण रेकॉर्ड होते. तेव्हा सत्य समोर आले. सुरेशने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि सर्व पुरावे सुपूर्द केले. पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली.



