Sunday, May 31, 2026
Homeमहाराष्ट्रअचानक मोठ्याने वाजू लागला फोन, सरकारने पाठवला महत्त्वाचा मेसेज, तुम्हाला आला काय?

अचानक मोठ्याने वाजू लागला फोन, सरकारने पाठवला महत्त्वाचा मेसेज, तुम्हाला आला काय?

जर तुमच्या मोबाईलवर जोरात विचित्र आवाजाची रिंग वाजली असेल आणि एखादा अनपेक्षित संदेश स्क्रीनवर दिसत असेल तर घाबरु नका. केंद्र सरकारने आज पुन्हा ‘आपत्कालिन अलर्ट’ प्रणालीची चाचणी केली. ही चाचणी देखील सर्वसामान्य मोबाईल वापरकर्त्यांना आज अनुभवता आली. मागे २ मे रोजी सरकारने दूर संचार विभाग ( dot ) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( एनडीएमए ) यांच्या संयुक्त प्रणालीद्वारे सेल ब्रॉडकास्ट राबविण्यात आले. अनेक देशात ही प्रणाली राबवण्यात येते.

 

दिल्ली-एनसीआर सर्व उत्तर भारतील बहुतांशी भागात शनिवारी सायंकाळ साडे पाच वाजता स्मार्टफोन अचानक जोराने वाजू लागले. अनेकजणांना त्यामुळे भीती वाटली. या वेळी मोबाईलवर वाजणारा संदेश लोकांनी घाबरत घाबरतच पाहिला. तर हा संदेश सरकारने हवामाना संदर्भात दिला होता.

 

मोबाईलवर वेगवान आवाज येऊ लागल्याने आज दिल्लीतील लोक घाबरले. त्यांच्या मोबाईलवर एक जोरदार साऊंड आला. हा SOS साऊंड आला. याची प्रणालीची टेस्टींग २ मे रोजी करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्यांदा अशी चाचणी झाल्याने अनेक लोक प्रचंड घाबरले. याचे नाव सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम आहे.

 

फोनवर अचानक हवामानाचा अलर्ट का ?

या संदेशात स्पष्टपणे लिहिले होते की येत्या ३ तासात जनपद येथील काही स्थानांवर विजांसह जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच पावसाच्या जोरदार सरींसह गारांचा वर्षाव होण्याची शक्यता या संदेशात वर्तवण्यात आली होती.

 

संकट किती गंभीर ?

स्मार्टफोनमध्ये पाठवलेल्या संदेशात असे स्पष्ट म्हटले आहे की ताशी ९० किमीच्या वेगाने वारा वाहू शकतो. तसेच वीजा चमकू शकतात आणि गारपीठीची देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे लोकांना कोणत्याही सुरक्षित स्थानी आसरा घ्यावा असे या संदेशात म्हटले होते.

 

भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ( एनडीएमए ) मदतीने देशभरात मोबाईल बेस्ड आपत्कालिन संचार प्रणालीला मजबूत केले आहे. सरकार या संदेशाच्या मदतीने भारतीय नागरिकांना तातडीने आपात्कालिन स्थितीत माहिती दिले जाते.

 

इस्रायलने देखील त्यांच्या नागरिकांना आवश्यक आणि इमर्जन्सी अलर्ट पाठवण्यासाठी या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. इस्रायल देशात मिसाईल, ड्रोन वा रॉकेटचा अलर्ट देण्यासाठी नागरिकांना या टेक्नॉलॉजीद्वारे अलर्ट पाठवले जातात. ज्यानंतर नागरिक सुरक्षित स्थानी वा बंकरमध्ये लपतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -