Homeक्रीडाकंठ दाटला अन् मराठीत शब्द फुटले…संन्यास जाहीर करताना अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात पाणी;...

कंठ दाटला अन् मराठीत शब्द फुटले…संन्यास जाहीर करताना अजिंक्य रहाणेच्या डोळ्यात पाणी; नेमकं काय म्हणाला?

भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे याने आता क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. आता मी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून यापुढे नवा प्रवास सुरू करणार आहे, असं त्यानं आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय.

 

अजिंक्य रहाणेने संन्यास घेतल्यानंतर त्याच्या एकूण कारकिर्दीबाबत बोललं जातंय. अजिंक्य रहाणे याच्या आंतरराष्ट्रीय करिअरला 2013 साली सुरुवात झाली. त्याने अनेकदा संकटमोचकाची भूमिका निभावत भारतीय संघाला विजयापर्यंत नेलेलं आहे.

 

दरम्यान, त्याने आता संन्यास घेतल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे. कधीकाळी भारतीय संघाचा भाग असलेल्या आणि आतादेखील भारतीय संघाकडून खेळणाऱ्या अनेक क्रिकेटपटूंनीही त्याचे अभिनंदन करत त्याच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

अजिंक्य रहाणे आपल्या करिअरच्या शिखरावर असताना त्याने मैदानावर मोठी कामगिरी केली. क्रिकेटने त्याला नाव, पैसा, प्रसिद्धी असं सगळंकाही दिलं. परंतु वैभव आल्यानंतरही त्याने त्याचे पाय मात्र नेहमीच जमिनीवर ठेवले. तो मुळचा डोंबिवलीचा आहे.

 

तो मराठी भाषिक आहे. आपण संन्यास घेतल्याचे जाहीर करत असताना त्याचा कंठ दाटला आणि त्याच्या तोंडून आपसुकच मराठी शब्द फुटल्याचे दिसले. क्रिकेटचे करिअर संपवत असतानाही तो मराठीला विसरला नाही. भावुक होत त्याने ‘तुम्ही मला कधीच परकं मानलं नाही,’ असं म्हणत सर्वांचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -