Saturday, July 27, 2024
Homeअध्यात्मस्वामी म्हणतात : घरात असतील अशा वस्तु : कधीच येणार नाही पैसा...

स्वामी म्हणतात : घरात असतील अशा वस्तु : कधीच येणार नाही पैसा !

मित्र – मैत्रिणींनो,  आपल्या सर्वांच्या घरात अशा काही गोष्टी असतात की त्या असल्यामुळे आपले बरेचसे नुकसान होत असते त्यामुळे अनेक फटके बसत असतात आणि घरी लक्ष्मी टिकत नसते.

घर वास्तुशास्त्रा पणाने असावं. सगळ्यात चांगली दिशा उत्तर आणि ईशान्य मानली जाते तसेच पुर्व, पश्चिम आणि वायव्य दिशा मध्यम मानतात व आग्नेय, दक्षिण, नैऋत्य दिशा खराब मानल्या जातात. हे आता पण आपण जाणतोच.

आता तुम्हीच ठरवा की तुमच घर कोणत्या दिशेला असायला हवं, ईशान्य दिशेला आकाश काही जास्तच मोकळं असत कारण की पृथ्वी त्याच दिशेला आपल्या अक्षात झुकलेली आहे.हेच कारण आहे या दिशेला ईश्वर दिशा म्हणातात.

मित्र – मैत्रिणींनो, आपल्या घरात कोण कोणत्या वस्तु असाव्यात आणि कोण कोणत्या नसाव्यात याला पण महत्व आहे.

घरातील पितळ, सोने,तांबे हे चांगले तर कांस्य,चांदी आणि जस्त याला मध्यम व लोखंड,स्टील,जर्मन याला निम्न मानले गेले आहे.

किचन मध्ये जास्त तर पितळ, तांबे, कांस्य, चांदी आणि लाकडाच्या वस्तु असायला हव्यात.

लोखंडाच्या कपाट ऐवजी लाकडी कपाट ठेवा.तिजोरी लोखंडाची ठेवू शकता. घरात प्लास्टिकच्या वस्तु आजिबात असू नयेत. पाहुयात अशाच काही चांगल्या व खराब वस्तू बाबत.

1) आपल्या घरात तुटलेल्या वस्तु:
मित्र – मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये तुटलेल्या वस्तु असू नये जस की फुटलेले ग्लास, भांडी, फोटो, फर्नीचर, पलंग, घड्याळ, कप, फुटलेले देवांचे फोटो असे समान घरात असल्यामूळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते.

आणि माणुस मानसिक त्रासाला समोरा जातो. त्याचा अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागतो.

2) खराब फोटो:
मित्र – मैत्रिणींनो, घरात जुने खराब फोटो असल्याने ही खूप त्रास होतो.  तसेच ताजमहाल, झरणे, युध्द,हिंसक प्राणी,काटेदार झाडे,वाळवंट इत्यादी प्रकारचे फोटो घरात असल्याने घरात उदासपणा,निराशा आणि अशांती येते.

3) फाटके तुटके कपडे कपडे:
आपल्या कडील खुप लोक घरात कपाटात जुने कपडे फाटके कपडे तसेच चादर ठेवतात त्याने देखील घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नकारात्मक ऊर्जा ही नेहमी आपणासाठी वाईटच असते.

4) घरातील कबाड:
अनेकदा घरात कबाड साठवून ठेवतात जस की लोखंड,प्लास्टीक,काच अश्या वस्तु जास्त असतात जे की योग्य नाही त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते.

अनेक महिला तसेच नागरिक असे कुठे काही मिळेल ते आणून घरात साठवत असतात पण ते अतिशय चुकीचे आहे.

5) जुने फाटलेले व तुटलेले चप्पल:
मित्र – मैत्रिणींनो, जुने व तुटलेले चप्पल घरात असल्याने तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यावर रोक लागते म्हणून त्याना पहिल्यांदा बाहेर फेकून द्या. असे चप्पल घरात ठेवू नका.

6) जुन्या पर्स किवा तिजोरी:
मित्र – मैत्रिणींनो, फाटलेली पर्स किवा तिजोरी असेल तर लक्ष्मी तुमच्या कडे कशी येईल पर्स मध्ये चावी किवा इतर कोणतीही अशुभ वस्तु ठेवू नका.

पर्स आणि तिजोरी मध्ये नेहमी पवित्र वस्तु ठेवा ज्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.ज्याना बघुन तुमचे मन प्रसन्न होईल. वातावरण तरुण प्रसन्न होईल.

7) जुनी तुटलेली, उघड कपाट :
पुस्तकं किवा काही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवण्यासाठी जी कपाट असतात त्याना दरवाजे नसतात अशी कपाटे उघडी मानली जातात.

तसे कपाट असल्याने वेग वेगळ्या प्रकारच्या अनेक कामात अडचणी येतात आणि पैसा पण पाण्यासारखा वाहुन जातो.आपल्याला कळतही नाही की आपले नुकसान कशामुळे होत आहे.

8) काही अंगठीतले खडे:
मित्र – मैत्रिणींनो, हा ही मुद्दा तसा खूप महत्त्वाचा आहे. कारण या अशा अंगठीतल्या खड्यांनी काय होते असे समजून आपण त्याचा साठा करत असतो.

तसेच काही लोक घरामध्ये अनावश्यक खडे ठेवतात त्याच सोबत देवाचे दोरे ताविज अंगठ्या इत्यादी समान घरातच ठेवतात त्याना माहित नसत की कोणता खडा फायदेशीर आहे.

आणि कोणता नुकसान कारक त्यामुळे अश्या प्रकारच्या वस्तु घरात ठेवू नका एक छोटासा खडा ही तुमच भाग्य दुर्भाग्य कडे घेऊन जाऊ शकतो.

तसेच जर तुम्ही अश्या काही अनावश्यक खडे घरात ठेवाल तर त्यातून येणारी ऊर्जा तुमच्या घरातील वातवरण बदलू शकतील.

मित्र – मैत्रिणींनो, ह्या साध्या गोष्टी आहेत पण या कारणाने आपल्या घराची प्रगती खूप मोठी होईल इकडे लक्ष दिल्याने आपणाला रोज थोडी थोडी प्रगती होताना ना आपल्याला दिसून येईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहेकोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वस्तू शास्त्र विषयी माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -