ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : पर्यटन आणि देवदर्शनासाठी कोल्हापुरात आलेल्या लातूर जिल्ह्यातील चार महिला पंचगंगा नदीत बुडता-बुडता बचावल्या. प्रसंगावधान राखून जीवरक्षक उदय निंबाळकर आणि काही नागरिकांनी चारही महिलांना पाण्यातून बाहेर काढले. यातील दोन महिलांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. हा प्रकार शनिवारी (दि. १३) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.
जीवरक्षक उदय निंबाळकर आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील आरणी येथील नऊ जण जण शनिवारी सकाळी पर्यटन आणि देवदर्शनासाठी कोल्हापुरात पोहोचले. पंचगंगा नदीत आंघोळ करून ते जोतिबाला जाणारा होते. पंचगंगा नदीवर पोहोचल्यानंतर यातील काही महिला आंघोळीसाठी गेल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने माधुरी दत्ता आंबाडे (वय २५, रा. आरणी, जि. लातूर) या बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी कोमल सुरेश क्षीरसागर (वय ३५), शामल राजकुमार क्षीरसागर (वय ५०) आणि मंगल सुरेश मगर (वय ४५, सर्व रा. आरणी, जि. लातूर) या तिघी पाण्यात उतरल्या. मात्र, या तिघीही खोल पाण्यात गेल्याने त्यांनी आरडा-ओरडा सुरू केला.
पंचगंगेत बुडणाऱ्या लातूरच्या चार महिलांना वाचवले, नदी घाटावर मंदिराजवळची घटना
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -