Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्रपाकिस्तानच्या किराणा हिल्समध्ये नेमकं काय? भारताच्या निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितली...

पाकिस्तानच्या किराणा हिल्समध्ये नेमकं काय? भारताच्या निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितली Inside स्टोरी

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी नुकतंच किराणा हिल्सवर झालेल्या हल्ल्याबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी किराणा हिल्सवर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे. भारतीय सैन्याचे लक्ष्य कधीच किराणा हिल्स नव्हते, तर तेथील नूरजहान एअर बेस होते. ब्रह्मोस किंवा अन्य क्षेपणास्त्र डागताना, जर ते लक्ष्य चुकून पुढे गेले तर त्यात भारताची चूक नाही, असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले.

 

पी के शाहू हे बीएसएफचे जवान होते ते चुकीने पाकिस्तानच्या बॉर्डर मध्ये चालले गेले आणि पकडले गेले मात्र यावेळी पाकिस्तानने त्याला काही त्रास न देता सोडल आहे … आपणही पाकिस्तानचे काही रेंजर पकडले होते त्यांना आपण सोडला आहे याचा अर्थ असा की रिलेशन नॉर्मल होण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे कारण वाट चुकलेले सैनिक आपण दोघांनीही एकमेकांना परत केले आहे, असे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले.

 

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये आणि सेनेच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितल होतं आम्ही गेले 30 वर्ष अमेरिकेच्या सांगण्यावरून आतंकवाद्यांना ट्रेनिंग दिलं आहे. त्यांनी अफगाणिस्तानचा संदर्भ दिला आणि सांगितलं की तिथे लोकांची लढायचं होतं, तेव्हा मुजाहिदीन लोकांना ट्रेन करायला सांगितलं होत. हत्यार द्यायला सांगितली होती ते आम्ही केलं. आम्ही जे काही केलं ते अमेरिकेच्या सांगण्यावरून केला आहे. दहशतवाद्यांचा आणि आमचा काही संबंध नाही हे त्यांचं जे वक्तव्य आहे ते मोदींनी देशाला संबोधित करण्याच्या आधीचा आहे त्यानंतर मोदींनी सांगितलं की आम्ही दहशतवादी आणि समर्थन घेणारे यात आम्ही फरक करणार नाही. ज्या भूमी वरून आमच्यावर हल्ला होईल त्या भूमीमध्ये त्या दहशतवाद्यांना समर्थन दिले जातं असं समजलं जाईल, असे अभय पटवर्धन यांनी म्हटले

 

ज्यावेळेला भारताने म्हटलं की पहलगामचा बदला आम्ही घेणार आहोत, त्याचवेळी पाकिस्तानने या लोकांना हलवलं असणार आहे. हाफिजला तर त्यांनी तीन चार दिवस आधीच हलवलं असेल. कारण त्याच्या मुलाला एलईडीची कमांड दिली होती. हे पाकिस्तान नेहमीच करतोय, भारतामध्ये आतंकवादी हल्ले होतात. तेव्हा त्या आतंकवाद्यांचे नेते यांना सुरक्षित ठेवण्याचा काम करतात. त्यांना जागा बदल करतात. दाऊदबद्दल असो की लष्करी तोयबाबद्दल पाकिस्तानने हेच केलं आहे आणि हे त्यांची जुनी सवय आहे, असेही अभय पटवर्धन म्हणाले.

 

किराणा हिल्सबद्दल काय म्हणाले?

किराणा हिलवर हल्ला झाला की नाही याची कुणालाही कल्पना नाही आपला टार्गेट हे किराणा हिल्स नव्हतंच, आपलं नूरजहान एअर बेस होता. आपण जेव्हा ब्रम्हओस किंवा इतर मिसाईल डागले तेव्हा काही मिसाईल जर टार्गेट चुकून पुढे गेले असेल आमच्या आर्मीच्या भाषेत त्याला प्लस टार्गेट म्हणतो. तस झालं असेल तर त्यामध्ये आपला दोष काही नाही. एका विदेशी पत्रकाराने पत्रकार परिषदेमध्ये हा विषय काढला होता, मात्र त्याला डायरेक्टर जनरल एअर मार्शलने उत्तर दिलं की याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. मात्र त्या ठिकाणी व्हिडीओ व्हायरल झाला की एका दरीमध्ये दोन ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यातून अणू उत्सर्जन होत आहे, याचा अर्थ असा होतो की पाकिस्तानचे कमांड सेंटर आहे आणि अणुअस्त्रच बटन हे दोन ते तीन लोकांजवळच असतं. ती सेफ सिस्टीम असतं.

 

तीन लोकांचा ऑथेटिकेशन झाल्यानंतरच न्यूक्लियर वेपन फायर केला जातो. मात्र नूर खान बेस मधून एक अंडरग्राउंड टनेल 30 ते 40 किलोमीटर गेली आहे. तो त्यांचा गुप्त रस्ता आहे असं म्हटलं जातं तर काही लोक असे म्हणतात की हे अमेरिकेने बांधला आहे. अमेरिकेचे अनवस्त्र ठेवलेले आहेत. अमेरिकेचे लोक तिथे आले आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे इजिप्तचे दोन विमान खनिज पदार्थ घेऊन आले आहे. असेही बोललं जातं जर समजा तिथे अणूउत्सर्जन झालं नाही, तर मग हे इजिप्त विमान का आली आणि अमेरिकेचे लोक का आले हा प्रश्न आहे. मात्र इजिप्तने अजूनही त्यावर दुजोरा दिलेला नाही, हे सगळं सॅटेलाईटच्या माध्यमातून जगाला कळला आहे. हा हल्ला केला किंवा नाही याबाबत अजूनही शंका आहे. आपण मात्र ते ऑफिशिअल ते नाकारलं आहे, असेही अभय पटवर्धन यांनी सांगितले.

 

“अमेरिकेचा राष्ट्रपती असलात तरी हरिश्चंद्र नाही”

 

“मी आधी सांगितलं होतं की ट्रम्प यांची जुनी सवय आहे. ती म्हणजे स्वतःच्या बढाया मारण्याची किंवा स्वतःची वलगणा करण्याची ही वल्गना त्यांनी यावेळी सुद्धा केली आहे. ज्या वेळेला सिजफायरचा शब्द निघत नव्हता, त्यावेळी त्यांनी दुपारी तीन वाजता सांगितलं की माझ्या मध्यस्थीमुळे हे दोघेही सिजफायरला तयार झालेले आहे. जेव्हा की करारावर हस्ताक्षर झालेली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की जर करार केला नाही तर मी व्यापार तुमचा बंद करेल ट्रम्प यांची बोलण्याची ही जुनी पद्धत आहे. त्यांच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी ज्या दिवशी ऑफिशिअल राष्ट्रपतीचा कारभार हातात घेईल त्या दिवशी रशिया आणि युक्रेनमध्ये शस्त्रसंधी घडून आणेल मात्र त्याला सहा महिने झाले आहे. अजून ते लोक बोलण्याच्या टेबलवर सुद्धा आले नाही अमेरिकेचा राष्ट्रपती असलात तरी तो हरिश्चंद्र नाही तो खोटंही बोलू शकतो” असं निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -