जागतिक नकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि.२७) अस्थिरता दिसून आली. बीएसई सेन्सेक्स ६२४ अंकांनी घसरून ८१,५५१ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १७४ अंकांच्या घसरणीसह २४,८२६ वर स्थिरावला.
गेल्या दोन सत्रात बाजारात तेजी राहिली होती. पण आज या तेजीला ब्रेक लागला. मुख्यतः आजच्या सत्रात ऑटो, आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप सपाट पातळीवर हिरव्या रंगात बंद झाले.