Thursday, June 26, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्सचं सहाव्यांदा चॅम्पियन्स होणं असंभव! ही आहेत 4 प्रमुख कारणं

मुंबई इंडियन्सचं सहाव्यांदा चॅम्पियन्स होणं असंभव! ही आहेत 4 प्रमुख कारणं

आयपीएलच्या 18 व्या मोसमात साखळी फेरीतील शेवटचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यानंतर क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटरमध्ये कोण खेळणार? हे निश्चित होईल. प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्सने प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. मात्र मुंबईसाठी प्लेऑफआधी चिंताजनक बातमी समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांचं टेन्शन वाढू शकतं. मुंबईसमोर प्लेऑफमध्ये प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करणं आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामागे तसं कारणही आहे.

 

मुंबईसमोर प्लेऑफमध्ये सर्वात मोठं आव्हान

मुंबईने साखळी फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. मुंबईने पहिल्या 5 पैकी 4 सामने गमावले. मात्र त्यांनतर जोरदार कमबॅक करत उर्वरित 9 पैकी 7 सामने जिंकले. मात्र साखळी फेरीनंतर मुंबई चौथ्या स्थानी राहिली. मात्र मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचलेल्या उर्वरित 3 संघांविरुद्ध साखळी फेरीत विजय मिळवता आला नाही. मुंबईला साखळी फेरीत गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळरु आणि पंजाब किंग्स विरुद्ध एकही सामना जिंकता आला नव्हता. मुंबईने या 3 संघांविरुद्ध एकूण 4 सामने खेळले. मुंबईचा या चारही सामन्यात पराभव झाला.

 

गुजरातने 29 मार्च रोजी 18 व्या मोसमातील नवव्या सामन्यात मुंबईवर 36 धावांनी मात केली होती. मुंबईसाठी हा सर्वात मोठा झटका होता. गुजरातचे फलंदाज आणि गोलंदाज या सामन्यात मुंबईवर वरचढ ठरले होते. त्यानंतर 7 एप्रिलला आरसीबीने 20 व्या सामन्यात मुंबईवर 12 धावांनी विजय मिळवला होता. मुंबईने या सामन्यात जोरदार लढा दिला. मात्र शेवटच्या सामन्यात मुंबई अपयशी ठरली. त्यानंतर 6 मे रोजी मुंबई आणि गुजरात दोन्ही संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आले. तेव्हा गुजरातने मुंबईवर 3 विकेट्सने मात केली होती. त्यानंतर आता सोमवारी 26 मे रोजी पंजाबने मुंबईवर 7 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -