Wednesday, June 25, 2025
Homeमहाराष्ट्रपुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा;

पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा;

गेले काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टयाला पावासाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. अशातच आता मुंबई आणि उपनगरांना पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.मुंबई आणि उपनगरात काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोरदार बॅटींग करायला सुरुवात केली आहे.

 

त्यामुळे पुढील 2 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अतिमुसळधार पावसाचा अंदाज

 

पुढचे 48 तास कोकणासह पश्चिम माहाराष्ट्रात मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्य़ानुसार कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. खासकरुन रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही जोरदार पाऊस राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं असा इशारा देण्यात आलेला आहे. बंगालाच्या उपसागराचं तापमान वाढल्याने मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन होत आहे.

 

त्यामुळे पावसाचं प्रमाण पुढीव 2 दिवस जास्त राहणार आहे. त्याबरोबर महाराष्ट्रातील इतर भागात देखील मध्य़म स्वरुपाचा पाऊस असणार आहे. राज्यात हवेचा कमी दाबाचा पट्टा असाच कायम राहिला तर आठवड्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यातील मुसळधार पावसाचा फटका हा आषाढी वारीला देखील बसल्याचं दिसून येत आहे. पंढरपुरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना देखील मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अनेकदा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी विठूराया साकडं घातल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -