Wednesday, June 25, 2025
Homeमहाराष्ट्रजेवण करून परत निघालेल्या तरूणांवर काळाचा घाला; चुलत भावांसह तिघांचा जागीच मृत्यू

जेवण करून परत निघालेल्या तरूणांवर काळाचा घाला; चुलत भावांसह तिघांचा जागीच मृत्यू

जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर बिल्डा गावाजवळील पुलानजीक सोमवारी रात्री ११ वाजता भीषण अपघात घडला. कार दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातात दोन चुलत भावांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

 

जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

प्राथमिक माहितीनुसार, एमएच २० ईजे १५८७ क्रमांकाची कार फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना बिल्डा गावाजवळील पुलानजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार दुभाजकावर आदळून उलटली आणि क्षणार्धात समोरचा भाग चक्काचूर झाला. मृतांमध्ये पिंप्री राजा येथील अरफात अशिफ बागवान (१७), रेहान जमील बागवान (१६) आणि रोशन गेट येथील सय्यद मारुफ सय्यद माजीद (१८) यांचा समावेश आहे. हे तिघेही चुलत भाऊ व मित्र असून छत्रपती संभाजीनगरच्या मोतीलाल नगर परिसरात शिक्षण घेत होते.

 

अपघातात उजेर खान व शरीफ शेख हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातावेळी सर्व युवक फुलंब्री येथे जेवणासाठी आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सहाणे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना त्वरित रुग्णालयात हलविले आणि अपघातग्रस्तांची मदत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -