नेत्रहीन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या भाकितांनी जगभरातील लोकांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये भीती, रहस्य आणि उत्साह यांचा समावेश आहे, ज्यामुळे त्या चर्चेचा विषय ठरतात.
जरी बाबा वेंगा यांचे 1996 मध्ये निधन झाले असले तरी, त्यांनी इ.स. 5079 पर्यंतच्या भविष्यवाण्या केल्याचा दावा केला जातो. मात्र, यासंदर्भात कोणतेही लिखित पुरावे किंवा दस्तऐवज उपलब्ध नाहीत.
बाबा वेंगाच्या भाकितांमध्ये नैसर्गिक आपत्ती, तिसरे महायुद्ध, मानवजातीचे पतन आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती यांचा समावेश आहे. 2026 या वर्षासाठीच्या त्यांच्या भविष्यवाण्यांबद्दल सोशल मीडियावर प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
बाबा वेंगा यांच्या मते, 2026 ते 2028 या कालावधीत जागतिक स्तरावर दुष्काळ आणि भूकबळीच्या समस्यांचा अंत होईल. चीन आर्थिक आणि लष्करी शक्तीच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती होईल. इतकेच नव्हे, तर याच काळात तिसऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
बाबा वेंगा यांच्या खऱ्या ठरलेल्या काही भविष्यवाण्यांमध्ये कुर्स्क पाणबुडी अपघात, आयसिसचा उदय, सिरियातील रासायनिक हल्ला, ब्रेक्झिट, 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि राजकुमारी डायना यांचे निधन यांचा समावेश आहे.
भारताबाबत बोलायचे झाले तर, बाबा वेंगा यांनी अतिवृष्टी, पूर, भूस्खलन आणि तापमानवाढीच्या संकटांचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, देशातील अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, ज्याचा भारतीय राजकारणावर मोठा परिणाम होईल.
विशेष म्हणजे, वैज्ञानिक या भविष्यवाण्यांना स्पष्टपणे नाकारतात. याची दोन मुख्य कारणे आहेत: एक, या भविष्यवाण्यांचा कोणताही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नाही; आणि दुसरे, अनेक भाकितं कालमर्यादेशी संबंधित असल्याने ती योगायोगाने खरी ठरल्याचे मानले जाते.