गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला. गुजरातच्या गोलंदाजांनी अप्रतिम बॉलिंग करुन आरसीबीला 155 धावांवर यशस्वीरपित्या रोखलं. त्यामुळे गुजरातला तुलनेत 156 धावांचं माफक आव्हान मिळालं. गुजरातने हे 156 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. गुजरातचा हा या मोसमातील एकूण पाचवा तर आरसीबी विरुद्धचा पहिला विजय ठरला. गुजरात 19 व्या मोसमात 5 सामने जिंकणारी पाचवी टीम ठरली. तसेच गुजरातने यासह आरसीबीवर मात करुन गेल्या पराभवाची अचूक परतफेड केली. आरसीबीचा हा या मोसमातील तिसरा पराभव ठरला. गुजरात विरुद्ध बंगळुरु या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.
गुजरातने बंगळुरु विरुद्ध 25 बॉल राखून विजयी आव्हान पूर्ण केलं. त्यामुळे गुजरातला पॉइंट्स टेबलमध्ये फायदा होण्याची अपेक्षा होती. मात्र नेट रनरेटचा अपवाद वगळता गुजरातला पॉइंट्स टेबलमध्ये काहीच फायदा झालेला नाही. या सामन्याच्या निकालानंतरही आरसीबी दुसऱ्या तर गुजरात पाचव्या स्थानी कायम आहे.
गुजरातला फायदा नाही आणि आरसीबीला तोटा नाही
गुजरातने 19 व्या मोसमात मोहिमेतील नवव्या सामन्यानंतर विजयी पंच लगावला. अशाप्रकारे गुजरातच्या खात्यात 10 गुण झाले आहेत. गुजरातचा विजयानंतर नेट रनरेट सुधारला आहे. गुजरातचा नेट रनरेट हा -0.192 असा झाला आहे जो सामन्याआधी -0.475 असा होता. मात्र गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये आहे तिथेच आहे. गुजरातने या विजयासह आपलं पाचवं स्थान भक्कम केलं आहे.
आरसीबीने मोठी संधी गमावली
आरसीबीला पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये तसं फार नुकसान झालं नाही. मात्र आरसीबीने मोठी संधी गमावली. आरसीबीकडे गुजरातला पराभूत करुन पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 होण्याची संधी होती. मात्र आरसीबीने पराभवासह संधी गमावली. आरसीबीचा पराभवानंतर नेट रनरेट हा 1.420 इतका आहे जो इतर 9 संघांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. या सामन्याआधी आरसाबीचा नेट रनरेट हा 1.919 असा होता.
शुक्रवारी पॉइंट्स टेबलमध्ये बदल फिक्स
दरम्यान शुक्रवारी 1 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना होणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. राजस्थानने सामना जिंकल्यास ते थेट चौथ्या क्रमांकावरुन टेबल टॉपर होतील. तसेच दिल्ली विजयी झाल्यास त्यांना एका स्थानाचा फायदा होईल. दिल्ली विजयासह सातव्या स्थानावरुन सहाव्या क्रमांकावर पोहचेल. त्यामुळे शुक्रवारी कुणाच्या बाजूने निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




