Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रऐकावं ते नवलच! मुख्याध्यापकानं चावला शिक्षकाचा अंगठा

ऐकावं ते नवलच! मुख्याध्यापकानं चावला शिक्षकाचा अंगठा

कॅटलॉगमधील चुका माफ करण्याच्या बदल्यात जेवण दिले नाही म्हणून मुख्याध्यापकाने शिक्षकाचा अंगठा चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गाच्या कॅटलॉगमध्ये चुका आहेत त्या दुरुस्त करून दे. आम्हाला जेवण दे. त्याच प्रमाणे पगार बिलातील कपातीच्या संदर्भात झालेल्या वादातून मद्यधुंद मुख्याध्यापकांनी अंगठा चावल्याची फिर्याद ब्रम्हचैतण्य जालिंदर राजगुरू (वय 38, रा. येवला, विठ्ठल नगर, निलांबरी, ता. येवला, जि. नाशिक) या शिक्षकाने येवला शहर पोलीस ठाण्यांमध्ये केली आहे. शिक्षण क्षेत्रात अशी घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

येवला तालुक्यातील नगरसूल येथील शिक्षण प्रसारक मंडळ येथे उपशिक्षक म्हणून नोकरीस असलेले राजगुरू यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सदर संस्थेत सुरेश एस अहिरे हे मुख्याध्यापक आहेत. फिर्यादी उपशिक्षक राजगुरू यांच्या पगारातील काही रक्कम कर्जासाठी पगारातून जात होती. यादरम्यान मुख्याध्यापक अहिरे पैशासाठी तगादा लावत होते. पण राजगुरु यांनी त्यास नकार दिला. यामुळे त्यांच्यात वाद झाला. मुख्याध्यापक अहिरे वेळोवेळी वेगळी कारणे सांगून पैसे घेत होते. पैसे घेऊनही ते धमकीवजा बोलायचे, असेही फिर्यादीमध्ये राजगुरू यांनी नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -