ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटा पाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून उद्धव ठाकरे यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्याची विनंती त्यातून करण्यात आली आहे.
‘खरी शिवसेना’ कुणाची? यासंबंधीचा निर्णय घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाला दिली जावी, अशी विनंती देखील करण्यात आली आहे. लोकशाही पद्धतीने पक्षात झालेल्या विभाजनाच्या मुद्दयावर न्यायालयाने हस्तक्षेप करून नये, अशी विनंती देखील शिंदे गटाने केली आहे.