Wednesday, August 6, 2025
Homeब्रेकिंगपेंशनसाठी हयातीचा पुरावा, अॅम्बुलन्समधून गाठलं 50 किमी अंतर; नागरिकांमध्ये संताप

पेंशनसाठी हयातीचा पुरावा, अॅम्बुलन्समधून गाठलं 50 किमी अंतर; नागरिकांमध्ये संताप

 

 

सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. सरकारी कार्यालयात कोणतंही काम असो ते एका झटक्यात झालंय असा अनुभव फारच कमी लोकांना येतो.मात्र, सरकारच्या लालफितीच्या फारभाराचा अनेकदा सर्वसामान्यांना फटका बसल्याचे पाहायला मिळालं आहे. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातून समोर आली आहे. पेंशनची रक्कम मिळावी यासाठी एका पेंशनधारकाला जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी रुग्णवाहिकेतून 50 किलोमीटर अंतर कापत कार्यालयात पोहचावं लागलं.

 

हयात असल्याचा पुरावा देण्यासाठी रुग्णवाहिका घेऊन कार्यालयात

पेंशनची रक्कम मिळावी यासाठी हयात दाखला गरजेचा असतो. हयातीचा दाखला मिळवण्यासाठी एका पेन्शनधारक रुग्णाला शासकीय गलथान कारभाराचा चांगलाच फटका बसला आहे. अर्धांग वायूचा झटका आणि खुब्याचं ऑपरेशन झालेल्या परिस्थितीत ॲम्बुलन्समधून बँक आणि शासकीय ट्रेझरी कार्यालयामध्ये स्ट्रेचरवरून फिराव लागलं.

सांगलीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळवा तालुक्यातल्या कणेगाव येथील युवराज संभाजी बनसोडे यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. पण या पेन्शनसाठी त्यांना नियमाप्रमाणे हयातीचा दाखला मागण्यात आला. त्यासाठी मग येलूर येथील बँकेकडून त्यांना सांगलीतील ट्रेझरी (कोषागार) कार्यालयामध्ये पाठवण्यात आले.

 

50 किलोमीटर रुग्णवाहिकेतून प्रवास

हयात असल्याचा पुरावा देण्यासाठी बनसोडे यांनी प्रकृती अत्यंत खालावली असताना ऍम्ब्युलनस मधून त्यांच्या नातेवाईकांना घेऊनयावे लागले. या धक्कादायक प्रकारामुळे ट्रेझरी आणि बँकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांने संपवली जीवनयात्रा

जत तालुक्यातील उमदी येथील शेतकऱ्याने बँक व सावकारी कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. नागप्पा मदगोंडा पडनुरे (वय 49) असे शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागप्पा मदगोंडा पडनुरे यांचे उमदी ते अंकलगी दरम्यान शेत आहे. द्राक्षबागेच्या उभारणीसाठी त्यांनी बँकेमार्फत व काही खाजगी सावकारांकडून कर्ज काढले होते. दरम्यान, दुष्काळी परिस्थिती व अवकाळी पावसाचा फटका बसल्याने उत्पन्न घटले होते. शिवाय त्यांच्या शेतीचे देखील मोठे नुकसान झाले होते. अशातच बेदाण्याचा दर गडगडल्याने पडनूर यांचे शेतीचे आणि जगण्याचे आर्थिक गणित कोलमडले होते. अलीकडे ते प्रचंड नैराश्य जीवन जगत होते.

त्यात शेती उभारणीसाठी घेतलेल्या कर्जसाठी खाजगी सावकार व बँकेचे लोकांनी ते भरण्यासाठी सतत तगादा लावला होता. परुंतु नागाप्पा यांची कर्ज परतफेड करण्याची कुवत राहीली नसल्याने त्यांनी स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत उमदी पोलीसांत नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -