पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अजून पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई केलेली नाही. पण एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेतले आहेत. भारतात सध्या हाय-लेव्हल बैठकांच सत्र सुरु आहे. कधीही, कुठलीही मोठी कारवाई होईल अशी स्थिती आहे. या दरम्यान भारताने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. पाकिस्तान विरोधात आणखी एक निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानसाठी आपला एअरस्पेस बंद केला आहे. 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत हा एअरस्पेस बंद केला आहे. या दरम्यान पाकिस्तानचे रजिस्टर्ड, ऑपरेटेड किंवा लीजच्या विमानांसह पाकिस्तानी मिलिट्री एअरक्राफ्टना या क्षेत्रात घुसण्याची परवानगी नसेल.
पाकिस्तानसाठी एअरस्पेस बंद केल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल. पाकिस्तानची विमान आधी भारतीय एअरस्पेसचा वापर करुन चीन, म्यानमार, थायलँड, मलेशिया आणि श्रीलंकेला जायची. पण आता एअरस्पेस बंद केल्याने त्यांना दूरवरच अंतर कापून या देशात जावं लागणार आहे. भारताने आपला एअरस्पेस बंद करण्याआधी पाकिस्तानी मीडियामध्ये एक बातमी आलेली. पाकिस्तान नॅशनल एअरलाइन्स पीआयएने गिलगिट, स्कार्दू आणि पाकव्याप्त कश्मीरमधील आपली उड्डाणं रद्द केली आहेत.
सर्व एअरपोर्ट्सन हाय अलर्टवर
उर्दू दैनिक ‘जंग’ च्या वृत्तानुसार पीआयएने कराची आणि लाहोरवरुन स्कार्दू पर्यंत दोन-दोन उड्डाण रद्द केली आहेत. इस्लामाबाद ते स्कार्दू आणि गिलगिटपर्यंत काही उड्डाण रद्द केली आहेत. पाकिस्तान आपल्या एअरस्पेसमधील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, सर्व व्यावसायिक उड्डाण सुरक्षा चिंतांमुळे रद्द केली आहेत. सावधगिरी म्हणून हे सर्व उपाय योजण्यात आले आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पाकिस्तान अथॉरिटीने सर्व एअरपोर्ट्सन हाय अलर्टवर ठेवलं आहे.