Wednesday, June 25, 2025
HomeBlogसकाळी ७ नको, ९ नंतर शाळा भरवा!

सकाळी ७ नको, ९ नंतर शाळा भरवा!

सकाळी ७ नको, ९ नंतर शाळा भरवा!

 

राज्यपालांनी सर्वच शाळांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर भरवावी, या मागणीकडे पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी महापालिका आणि शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे.

 

इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतरच भरवाव्यात, असा निर्णय गेल्या वर्षी राज्यपालांनी जाहीर केला. त्यानंतर उन्हाळ्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सकाळी ९ वाजल्यानंतरच शाळेत बोलवावे, असा निर्णय शासनाने जारी केला होता. या पार्श्वभूमीवर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सकाळी ९ पूर्वी बोलावू नये. त्याऐवजी उच्च प्राथमिक आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना सकाळी बोलवावे, याबाबत पालक आग्रही आहेत.

 

राज्यपालांनी जर निर्णय घेतला आहे, तर पहिली ते पाचवीच्या शाळा या सकाळी ९ नंतरच ठेवल्या पाहिजेत; म्हणजे मुलांचा आराम होईल. त्यांचे आरोग्य ठीक राहील. शासनाने, महापालिकेने त्याची अंमलबजावणी करावी.

– येशू जगाली, पालक, चेंबूर

 

९ नंतरच शाळा का ?

– बालकांची झोप पूर्ण होते.

– शरीर थकलेले नसते.

– चिडचिडेपणा कमी होतो.

– आळस गेलेला असतो.

– मानसिकरीत्या ती सज्ज असतात.

– अभ्यासात त्यांचे लक्ष लागते.

– शैक्षणिक दर्जा सुधारतो.

-शिक्षकांना ती उत्तम सहकार्य करतात.

 

लहान वयातील बालकांना सकाळी लवकर शाळेत पाठवल्यास त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. जगभर प्राथमिक शाळेतील बालकांना सकाळी ९ वाजल्यानंतरच शाळेत बोलावतात. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -