कोकणात जाणाऱ्या ट्रेन, बस यांचं बुकिंग फूल झालं असल्याने चाकरमान्यांसमोर चिंता आहे. गावी नेमकं जायचं तरी कसं असा प्रश्न कोकणवासियांना सतावत आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 367 अधिक फेऱ्या होती याची योजना आखली असल्याचं त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
“अश्विनी वैष्णव यांनी जास्त गाड्या सोडण्याची विनंती केली होती. त्यांनी पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी मागील वर्षीपेक्षा जास्त 367 फेऱ्यांची योजना आखली आहे. मागच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. त्यामुळे मुंबई आणि इतर भागातील लोकांना रेल्वेची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यासाठी मी त्यांचे आणि पंतप्रधानांचे आभार मानतो. चाकरमानी आणि कोकणात राहणारे मुंबईकर यांच्यासाठी ही मोठी व्यवस्था केली आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.
गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेसची घोषणा
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. यंदा कोकणवासीयांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज होणार आहेत. अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
कोकणवासीय गणेशभक्तांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस विशेष रेल्वे सेवा गेली 12 वर्षे अविरतपणे नागरिकांच्या सेवेत आहे. परंतु यंदा हि सेवा स्पेशल असून दोन ट्रेन नागरिकांच्या सेवेत सज्ज होणार आहेत. यावर्षी कोकणवासीयांच्या सेवेसाठी 2 विशेष ट्रेन सोडणार असून सर्व प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
दिनांक 23 व 24 ऑगस्ट 2025 अशा दोन दिवशी सकाळी 11 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून या रेल्वे सुटणार आहेत. याचे तिकीट वाटप सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करायची आहे.
शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी 11 वाजता सुटणारी ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळ ला थांबेल, या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल. तसेच रविवार 24 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन वैभववाडी व कणकवली येथे थांबेल. या डबल धमाका स्पेशल मोदी एक्स्प्रेस चा लाभ सर्व कोकणवासीयांना घ्यावा असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
FAQ
1) गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे विशेष गाड्या चालवते का?
होय, कोकण रेल्वे गणेशोत्सवात प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून विशेष गाड्या चालवते. 2025 मध्ये, 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत विशेष गाड्या चालवण्याची घोषणा झाली आहे, ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांमधून कोकणातील सावंतवाडी, कुडाळ, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी गाड्या धावतील.
2) विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे कुठे पाहता येतील?
गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि इतर माहिती www.enquiry.indianrail.gov.in वर उपलब्ध आहे. यामध्ये गाडी क्रमांक, प्रस्थान आणि आगमन वेळा यांचा समावेश आहे
3) 2025 मध्ये कोणत्या विशेष गाड्या चालवल्या जात आहेत?
काही प्रमुख विशेष गाड्यांमध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे:गाडी क्र. 01151 / 01152: मुंबई CSMT – सावंतवाडी रोड (दररोज) – मुंबई CSMT येथून 00:20 वाजता सुटते आणि सावंतवाडी रोड येथे 14:20 वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात सावंतवाडी रोड येथून 15:35 वाजता सुटते आणि मुंबई CSMT येथे 04:35 वाजता पोहोचते. थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कुडाळ इत्यादी.
गाडी क्र. 01131 / 01132: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – सावंतवाडी रोड (द्वि-साप्ताहिक) – LTT येथून 08:45 वाजता सुटते आणि सावंतवाडी रोड येथे 22:20 वाजता पोहोचते.
गणपती मोदी एक्सप्रेस: 23 आणि 24 ऑगस्ट 2025 रोजी दादर येथून सकाळी 11:00 वाजता सुटणारी विशेष गाडी, जी सावंतवाडी येथे पोहोचते. ही गाडी मोफत प्रवास, जेवण आणि पाणी पुरवते.