महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे. आतापर्यंतची सर्वात यशस्वी योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे.
या योजनेत तब्बल अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी काही नियम आहेत. जर तुम्ही या नियमात बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत केवायसीकरणे अनिवार्य केले होते. दरम्यान, केवायसी न केलेल्या महिलांचे लाभ बंद होणार आहे. त्याचसोबत केवायसी केलेल्याही काही महिलांचे लाभ बंद केले जाणार आहेत.
केवायसी केले तरी या महिलांचा लाभ होणार बंद (Ladki Bahin Yojana KYC Done Still Women Not Get Money)
लाडकी बहीण योजनेत प्रत्येक लाभार्थी महिलेला केवायसी करणे अनिवार्य होते. याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. त्यानंतर आता कोणालाही केवायसी करता येणार नाही. या योजनेत केवायसी केले तरीही काही महिलांचा लाभ बंद केला जाऊ शकतो.
लाडक्या बहिणींचे १५०० बदं होणार; कारण काय? (Ladki Bahin Yojana Women Benefit Stoppes Know the Reason)
लाडकी बहीण योजनेत केवायसीद्वारे महिलांच्या अर्जांची किंवा माहितीची पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ बंद केला जाईल. या केवायसीद्वारे महिलांच्या व त्यांच्या वडिलांची किंवा पतीच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद होईल. याचसोबत ज्या महिला वयोमर्यादेत बसत नाही त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे.






