Friday, May 22, 2026
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली सूत्रे हातात, एलपीजीच्या संकटात मंत्र्यांना अत्यंत मोठ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली सूत्रे हातात, एलपीजीच्या संकटात मंत्र्यांना अत्यंत मोठ्या सूचना, आता..

इराण आणि अमेरिका युद्धात संकट उभे आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने इंधन पुरवठा विस्कळीत झाला. पूर्ण साखळीच विस्कळीत झाली. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीवर तणाव आहे. किती नाही म्हटले तरीही कुठे ना कुठे एक तणाव बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट तणाव भारतात बघायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीमध्येही वाढ झाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढताना दिसत आहेत. एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. ज्याने अनेक व्यवसायांवरही परिणाम झाला. महागाई थेटपणे वाढली. लोकांना वेळेवर एलपीजी गॅस मिळत नाहीये. यामुळे दिवसेंदिवस समस्या या वाढतच आहेत. जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून हे युद्ध सुरू आहे. आता या सर्व संकटांवर तोडगा काढण्याकरिता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. त्यांनी या संकटातून मार्ग काढण्याकरिता पुढाकार घेतला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दाैऱ्यावर होते. भारतात दाखल होताच त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. ही बैठक दिल्लीत तब्बल 4 तासांपेक्षाही जास्त वेळ सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात आपल्या मंत्र्यांना सांगितले की, एलपीजीचे नवीन पुरवठादार शोधा. होर्मुज खाडीत तणाव आहे, तोपर्यंत भारतात इतर मार्गाने एलपीजी गॅस कसा आणता येईल, यावर काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

मोदी सरकार ऊर्जा सुरक्षेबाबत अधिकाधिक सतर्क असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना पर्यायी ऊर्जा स्रोतांवरील कामाला गती देण्याचे आवाहन केले. एलपीजीला पर्याय म्हणून बायोगॅसच्या प्रचारावर भर दिला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, येणारा काळ हा अधिक आव्हानात्मक असू शकतो. भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी जलद पावले उचलावी लागतील.

 

पश्चिम आशियातील संकट आणि तेल पुरवठ्यावरील संभाव्य धोका लक्षात घेता, सरकार आता दीर्घकालीन धोरणाचा अवलंब करू इच्छिते. सरकारकडून सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, परिस्थिती जागतिक पातळीवर भयंकर आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले नाही तर स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -