Thursday, March 28, 2024
HomeसांगलीSangli News: मुलं पळवणारी टोळी असल्याचे समजत चार साधूंना बेदम मारहाण

Sangli News: मुलं पळवणारी टोळी असल्याचे समजत चार साधूंना बेदम मारहाण

राज्यातील सांगलीमध्ये (Sangli)एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं पळवणारी टोळी आल्याचे समजत साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या जत (Jath) तालुक्यातील लवंगा (Lavanga) गावामध्ये ही घटना उघडकीस आली. मुलं पळवणारी चोरांची टोळी आली असा समज ग्रामस्थांचा झाला आणि त्यांनी चार साधूंना बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल (Sadhu marhan video viral) झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांनी (Sangli police) हस्तक्षेप केल्यानंतर साधूंची सर्व माहिती तपासून त्यांची सुटका करण्यात आली. अगदी थोड्यावरुनच पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती टळली आहे.

उत्तर प्रदेशातील आहेत साधू


हे चारही साधू उत्तर प्रदेशातील असल्याची माहित आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सांगली पोलिसांनी माहिती दिली की, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत. ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजली नाही. यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी आल्याच्या संशयातून गावकऱ्यांकडून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया


या साधूंना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया पहायला मिळथ आहेत. उत्तर प्रदेशातील या साधूंच्या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर लोक टीका करत आहेत. पालघरमधील मॉब लिचिंगचे प्रकरण अजून ताजे आहे. असे असतानाच ही घटना घडल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी देखील केली जातेय.

रस्ता विचारला आणि…


देवदर्शनासाठी जात असताना हे साधू रस्ता चुकले होते. त्यांनी एका मुलाला पत्ता विचारला आणि घात झाला. एका साधूने लवंगा गावातील मुलाला पत्ता विचारला होता. यामुळे लवंगा गावातील लोकांना वाटले की, मुलं चोरणारी टोळी गावात आली आहे. त्याच गैरसमजामुळे नागरिकांनी चार साधूंना बेदम मारहाण केली.

पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते साधू


हे साधू पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. कर्नाटकमधून जत मार्गाने ते पंढरपूरकडे जात होते. दरम्यान ते लवंगा गावच्या हद्दीत आले असताना गावामध्ये लहान मुलं चोरणारी टोळी शिरल्याची अफवा पसरली. यातूनच नागरिकांचा संताप झाला. लोकांनी साधूंना पकडून त्यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी त्या सर्व साधूंची आधार कार्ड घेऊन माहिती तपासली. त्यानंतर साधूंची सुटका करण्यात आली. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -