Thursday, February 6, 2025
Homeराजकीय घडामोडीतासगाव : ‘कवठेमहांकाळ’ची सावली ‘तासगाव’वर पडणार?

तासगाव : ‘कवठेमहांकाळ’ची सावली ‘तासगाव’वर पडणार?

कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये सर्व मातब्बरांना लढा देऊन स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दाखवणार्‍या रोहित पाटील यांची भूमिका तासगावच्या बाबतीतही तेवढीच लढाई देणारी राहणार का, ते भाजपचा बालेकिल्‍ला सर करू शकणार का, असे प्रश्‍न आता तासगावकरांसमोर आहेत. कवठेमहांकाळच्या निकालाची सावली तासगाववर पडणार का, याची प्रतीक्षा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आहे.

तासगाव पालिका (स्व.) आर. आर. पाटील यांनी स्वतःचा बालेकिल्‍ला म्हणून नेहमीच ताब्यात ठेवली होती. मात्र त्यांच्या पश्चात अवघ्या चार महिन्यात खासदार पाटील यांनी हा बालेकिल्‍ला आपल्या ताब्यात घेतला. गेल्या सात वर्षांत खासदार पाटील गटाकडे अबाधित राहिलेला हा किल्‍ला यंदा कवठेमहांकाळच्या निकालानंतर राष्ट्रवादी जिंकू शकेल, अशी अशा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पल्‍लवीत झाल्या आहेत.
मात्र खासदार – आमदार गटात असलेल्या कथित छुप्या युतीच्या राजकारणामुळे तासगावचा विकास झालाच नाही. सत्ताधारी भाजपने केवळ विकासाची चर्चाच केली. राष्ट्रवादीला विरोधी भूमिका पार पाडता आली नाही. त्यामुळे तासगाव शहराच्या विकासाला सुरुवातच झाली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -