Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगसांगली : विसापूरमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेततळ्यात पडून मृत्यू

सांगली : विसापूरमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेततळ्यात पडून मृत्यू

विसापूर (ता. तासगाव) येथे शेततळ्यात पडलेल्या शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या कमल आनंद जाधव (वय ६५) या महिलेचा शेतळ्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत पोलीस पाटील संदीप पाटील यांनी तासगाव पोलिसात वर्दी दाखल केली आहे.

फेसबूक देत आहे विनातारण 2 ते 50 लाखापर्यंत कर्ज ! व्हिडिओ पहा

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील कमल जाधव ह्या शेळ्या चरण्यासाठी खानापूर रस्त्यावरील कुंभार टेक परिसरात गेल्या होत्या. या ठिकाणी शिवाजी माने यांचे शेततळे आहे. या शेततळ्यात त्यापैकी एक शेळी पाणी पिण्यासाठी गेली असता शेळी पाय घसरून पाण्यात पडली. त्या शेळीला वाचवण्याचा जाधव प्रयत्न करत असतानाच त्यांचा तोल गेल्यानं त्या शेततळ्यात पाय घसरून पडल्या. शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -