किणी; पुढारी वृत्तसेवा : मुदत संपूनही पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कर वसुली ही अद्याप सुरूच आहे. ही करवसुली तातडीने बंद करावी या मागणीसाठी किणी टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने बँड बाजासह कलश मिरवणूक काढत, हे आंदोलन करण्यात केले. जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत, आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे किणी (जि.कोल्हापूर) व तासवडे (जि.सातारा) हे दोन्ही टोलनाके २४ जूनच्या मध्यरात्री हस्तांतरीत करण्यात आले. मुदत संपली असतानाही टोल वसूली सुरूच ठेवण्यात आली आहे. या टोलसाठी सहा पदरीकरणाचे कारण सांगण्यात येत आहे. पण सहा पदरी रस्ता, अद्याप झालेलाच नाही. आतापर्यंत केलेल्या खर्चाचा व वसुलीचा हिशोब न देताच वाहनधारक जनतेला लुटण्याचे काम ठेकेदार, केंद्र व राज्य शासनाचे अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. असा आरोप करत, या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : किणी टोलनाक्याची मुदत संपूनही, कर वसुली सुरूच; मनसेकडून आंदोलन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -