Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडाचिन्नास्वामीवर केकेआरचा विजयी डंका! किंग कोहलीच्या घरच्या मैदानात पाजले पराभवाचे पाणी

चिन्नास्वामीवर केकेआरचा विजयी डंका! किंग कोहलीच्या घरच्या मैदानात पाजले पराभवाचे पाणी

कोलकाताने बंगळुरूच्या घरच्या मैदानावर त्यांना पराभवाचे पाणी पाजले.. कोलकाताने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी केवळ ८ बाद १७९ धावाच करू शकला. अशारितीने कोलकाताने हा सामना २१ धावांनी जिंकला. सुरुवातीपासूनच कोलकाताचा संघ शानदार फॉर्मात होता आणि आता हा सामना जिंकून केकेआरच्या संघाने शानदार कमबॅक केले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीचा हा यंदाच्या आयपीएलमधील पहिला पराभव आहे. विराटशिवाय आरसीबीची आघाडीची फळी शांत झाली आणि त्यामुळेच संघाला हा पराभव पाहावा
लागला.

रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बंगळुरूच्या घरच्या मैदानावर सामना खेळवला गेला. या सामन्यात सुरुवातीपासूनच कोलकाताचा संघ आपल्या
शानदार फॉर्मात दिसून आला. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय काही संघाच्या पथ्यावर पडलेला दिसला नाही. कारण कोलकाताच्या सलामीवीरांनी जबरदस्त फटकेबाजी केली आणि गोलंदाजांना चांगलेच नमवले.

आरसीबीच्या गोलंदाजांना पहिल्या डावात १०व्या षटकात पहिली विकेट मिळवण्यात यश आले. पण तोपर्यंत जेसन रॉयने अवघ्या २२ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. आणि कोलकाताला शानदार सुरुवात करून दिली. त्यानंतर व्यंकटेश अय्यर (३१) आणि नितीश राणाने (४८) भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येचा दिशेने नेले. त्यानंतर रिंकू सिंगने मैदानात येत १० चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारत झटपट १८ धावा केल्या. तर डेव्हिड बीझने ३ चेंडूत २ षटकार लगावत १२ धावा केल्या आणि संघाची धावसंख्या २०० वर नेऊन ठेवली.

पहिल्या डावात सिराजला आपल्या शानदार गोलंदाजीचे दर्शन घडवता आले नाही. त्यामुळे आरसीबीला मोठा तोटा झाला. सिराजने आजच्या सामन्यात केवळ १ विकेट मिळवली. तर हसरहल पटेलही आजच्या सामन्यात एकही विकेट मिळवू शकला नाही. विजयकुमार आणि हसरंगाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर याचसोबत हर्षल पटेल आणि सिराजने एकेक झेल सोडला, ज्याचा फटकाही संचाला बसला. आरसीबीची सुरुवात चांगली झाली. विराट आणि फॅफने शानदार सुरुवात करत पहिल्या दोन घटकात २९ धावा कुटल्या. पण सुयश शर्माने पॉवरप्लेमध्येच पॅफ आणि शाहबाज या २ महत्त्वाच्या विकेट मिळवल्या.

विराट कोहली आणि लोमरोरने त्यानंतर संघाचा डाव उचलून धरला. विराटने झटपट धावा गोळा करत ३७ चेंडूत अर्धशतक झळकावले. पण त्याआधी मॅक्सवेल ५ धावा करत बाद झाला. तर लोमरोरही वरून चक्रवर्तीच्या चेंडूवर बाद झाला.
विराट मैदानात होता त्यामुळे आरसीबीच्या विजयाच्या आशा कायम होत्या. पण रसेलने १३व्या षटकातच त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले.

व्यंकटेशने बाऊंड्री लाईनजवळ शानदार झेल टिपला. त्यानंतर फलंदाजासाठी आलेल्या दिनेश कार्तिककडून संघाला आशा होत्या. त्याने फटकेबाजी केली पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दिनेश कार्तिकमुळे सुयश प्रभुदेसाईही धावबाद झाला. तर रसेलच्या चेंडूवर हसरंगाही बाद झाला. अशाने आरसीबीच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.
तर कोलकाताकडून गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत सुयश शर्मा आणि रसेल यांनी प्रत्येकी २ तर वरून चक्रवतीने ३ विकेट मिळवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -