Monday, February 24, 2025
Homeब्रेकिंगमोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ लोकांना मिळणार मोफत उपचार; वाचा सविस्तर

मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ लोकांना मिळणार मोफत उपचार; वाचा सविस्तर

आज देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार एकापेक्षा एक मस्त मस्त योजना राबवत आहे. ज्याचा फायदा एकाच वेळी देशातील लाखो नागरिकांना होताना दिसत आहे.

 

अशी एक लोकप्रिय योजना म्हणजे ‘आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना’ . या योजनेंतर्गत पात्र लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत आहे. (Ayushman Card)या योजनेत तुम्हाला सामील व्हायचे असेल तर प्रथम तुम्हाला पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर या लेखात जाणून घेऊया या आयुष्मान योजनेसाठी कोण पात्र ठरू शकते.

 

या ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना’ अंतर्गत, आयुष्मान कार्ड अशा लोकांसाठी बनवले जातात जे पात्र आहेत. यानंतर, या कार्डधारकांना सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.

या योजनेसाठी पात्र कोण आहेत

 

भूमिहीन व्यक्ती असेल तरजर तुमचे घर मातीचे असेल

 

जर कोणी रोजंदारी मजूर असेलएखादी व्यक्ती जी अनुसूचित जाती किंवा जमातीशी संबंधित आहे

 

ग्रामीण भागात राहणारे लोक

 

जो निराधार किंवा आदिवासी आहे

 

तुमच्या कुटुंबात एखादा अपंग सदस्य असल्यास, तुम्ही आयुष्मान कार्ड बनवून त्याचा लाभ घेऊ शकता.वर दिलेल्या यादीनुसार तुम्ही पात्र असल्यास, तुम्ही आयुष्मान कार्ड बनवू शकता. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार मिळू शकतात आणि संपूर्ण खर्च सरकार उचलते. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही लवकरात लवकर आयुष्मान कार्ड बनवून मोफत उपचार घेऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -