Thursday, February 6, 2025
Homeक्रीडासचिनसोबतंही असंच घडलं होतं...; रोहितचा संदर्भ देत जयवर्धनेचा मोठा खुलासा

सचिनसोबतंही असंच घडलं होतं…; रोहितचा संदर्भ देत जयवर्धनेचा मोठा खुलासा

नुकतंच मुंबई इंडियन्सच्या टीमने मोठा निर्णय घेतला आणि रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा सोपवली. दरम्यान टीम मॅनेजमेंटतचा हा निर्णय चाहच्यांना अजिबात रूचलेला नाही. यानंतर मुंबई इंडियन्सला अनेक टीकांना सामोरं जावं लागतंय. अशातच आता टीमचे ग्लोबल प्रमुख महेला जयवर्धनने स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी जयवर्धनने सचिन तेंडुलकरचं उदाहरण देत म्हटलंय की, सचिनसोबत देखील असं घडलं होतं, तो देखील ज्युनियरच्या नेतृत्वाखालीही खेळला. मात्र चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, जयवर्धनेने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय सचिन तेंडुलकरचा स्वतःचा होता, असं म्हणायला हवं होतं.

दरम्यान रोहित शर्माला कर्णधारपदावरून वगळण्याचा निर्णय त्याच्या सहमतीने दर्शवला होता का, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मुंबई इंडियन्सला असा विश्वास आहे की, रोहित शर्मा टीमसाठी अविभाज्य भूमिका बजावत राहणार आहे. IPL 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर बदल करण्याबाबत विचार होईल. महेला जयवर्धने यांनी मंगळवारी सांगितले की, फ्रँचायझीमधील खेळाडूंच्या पुढील पिढीला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने रोहित पाच वेळा चॅम्पियनसाठी ‘खूप महत्त्वाचा’ असणार आहे, असंही म्हटलंय.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचं नाव घेतलं जातं. मुंबई इंडियन्सने आपल्या सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला घेण्याचा निर्णय घेतला. हे कितपत योग्य की अयोग्य हे येणारा काळच सांगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 4 वेळा ट्रॉफीवर नाव कोरण्यात यश मिळालं आहे. जयवर्धने यांनी पुढे सांगितलं की, मुंबई इंडियन्स ‘रीसेट’ बटन दाबण्यासाठी फार उत्सुक आहे. मुख्य म्हणजे ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आम्ही फ्रेंचायझी म्हणून बोललो आहोत. हा एक कठीण निर्णय आहे, पण आम्हाला तो घ्यावा लागला. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे फार इमोशनल आणि कठीण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -