देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशीविवाह केला जातो. यावर्षी देवउठनी एकादशी 14 आणि 15 नोव्हेंबर 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. पौराणिक कथेनुसार भगवान शालिग्रामचा विवाह तुळशीशी झाला होता. श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. या दिवशी तुळशीचा विवाह (Tulsi Vivah) भगवान श्रीकृष्णाशी शालिग्रामच्या रूपात केला जातो.
सोमवार 15 नोव्हेंबर 2021 रोजी तुळशी विवाह केला जाईल.
द्वादशी तिथी आरंभ – 15 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 06:39 वाजता
द्वादशी तिथी समाप्ती – 16 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 08:01 वाजता
तुळशीचा विवाह चे महत्व
हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीला जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच वैज्ञानिक महत्त्वही आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. धार्मिकदृष्ट्या तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते, जिचा विवाह भगवान शालिग्रामशी झाला होता. खरे तर शालीग्राम हे भगवान विष्णूचा आठवा अवतार श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. भगवान विष्णू चार महिन्यांनंतर देवउठनी किंवा देवोत्थान एकादशीला जागे होतात. तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हणतात. म्हणून जेव्हा देव जागे होतात तेव्हा हरिवल्लभ तुळशीची प्रार्थना ऐकतात. देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशीचा विवाह शालीग्रामशी होतो. जर एखाद्या व्यक्तीला मुलगी होत नसेल आणि त्याला आयुष्यात कन्या दान करण्याची इच्छा असेल तर तो तुलशीविवाह करून तो आनंद मिळवू शकतो.
एकादशीला का केला जातो तुळशीविवाह, जाणून घ्या तिथी आणि महत्त्व
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -