जे लोक शिक्षक भरतीची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आता शिक्षण भरतीला सुरुवात झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 30 टक्के रिक्त जागांपैकी 10 टक्के पदाभरतीची जाहिरात आता पवित्र पोर्टलवर निघालेली आहे.
खाजगी अनुदानित संस्था देखील या भरतीमध्ये सहभाग घेता येणार आहे. जिल्हा परिषदांमधील 3500 तर खाजगी संस्थांमधील साडेसहा हजार पदे देखील यावेळी भरली जाणार आहे. राज्याचे शिक्षण मंत्री यांनी याबाबतची अधिसूचना जाहीर केलेली आहे. या जाहिरातीनुसार 30 हजार शिक्षकांची भरती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मागील 10 वर्षातील सगळ्यात मोठी शिक्षक भरती (Teacher Recruitment) होणार आहे. त्या जिल्हा परिषदांमधील 22 हजार पदांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमानुसार 30% पदे रिक्तच राहतील.
ही रिक्त पदे ऑगस्ट महिन्यात भरली जाणार आहे. याआधी खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नव्हती. परंतु यावेळी त्यांना संधी आहे.
शिक्षक भरतीपूर्व ‘टीईटी’ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये
शिक्षक होण्यासाठी तुम्हाला डीएड, बीएड उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना टीईटी परीक्षा देखील उत्तीर्ण करावी लागते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टीईटी घेण्याचे नियोजन सुरू आहे. आणि आता त्यासंबंधीचा निविदा काढण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे आता ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.