वाढते इंधन दर, वाढत्या रिक्षांच्या किमती, वाढते स्पेअर पार्ट यामुळे रिक्षाचालक आर्थिक आयुष्यात सापडत चालला आहे याचा विचार करत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला या निर्णयात तीन रुपयांची प्रत्येक टप्प्याला वाढ करण्यात आली आहे.
आता पहिल्या टप्प्यासाठी 25 रुपये आणि पुढील प्रत्येक टप्प्यासाठी 23 रुपये भाडे वाढ करण्यात आली आहे तसेच रात्रीच्या वेळी जे प्रवासी प्रवास करतात त्यांना रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत भाड्याच्या रकमेवर 25% ज्यादा आकारणी करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी उद्या एक मार्चपासून करण्यात येणार आहे.
दरम्यान या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.