Tuesday, March 11, 2025
Homeक्रीडाचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाचं ‘ग्रँड वेलकम’ का होणार नाही?

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाचं ‘ग्रँड वेलकम’ का होणार नाही?

चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy) 2025 जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू मायदेशी परतले आहे. परंतु यावेळी हा ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बस परेड होणार की नाही? याकडे चाहत्याचे लक्ष आहे. मायदेशी परतल्यावर प्रत्येक क्रिकेट चाहत्याला टीम इंडियातील खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करायचे आहे. परंतु खेळाडू मायदेशी परतल्यावर वेगवेगळ्या शहरांना रवाना होणार आहेत.

 

यातून कुठेतरी हे देखील स्पष्ट होते की टीम इंडियाची बस परेड आयोजित केली जाणार नाही. गेल्या वर्षी जेव्हा भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला तेव्हा संपूर्ण संघाचे मायदेशी परतल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या जल्लोषात बस परेडही खूप रंगतदार झाली होती. पण आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, तरीही बस परेड होणार नसल्याचे संकेत आहे.

 

 

बस परेड नसण्याचे एक प्रमुख कारण हे देखील असू शकते की आयपीएल 2025 अवघ्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. आयपीएलचा नवीन सीजन यंदा 22 मार्चपासून सुरू होणार आहे, पहिला सामना कोलकाता येथे KKR आणि RCB यांच्यात रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy) संपण्यात आणि आयपीएल सुरू होण्याच्या तारखेत फार कमी दिवसांचे अंतर आहे. अशा परिस्थितीत सर्व खेळाडू आपापल्या आयपीएल संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यापूर्वी काही दिवस विश्रांती घेतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -