गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे, पूर्व आणि मध्य भारतात उन्हाचा कडाका वाढला असून, प्रचंड उष्णता जाणवत आहे, तर दुसरीकडे उत्तर भारत आणि इतर काही राज्यांमध्ये पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये, पुन्हा एकदा आयएमडीकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये पावसानं हजेरी लावली. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. त्यानंतर आता उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान सध्या देशावर दुहेरी संकट पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या तीन राज्यांमध्ये पुढील तीन दिवस प्रचंड उकडा जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या देखील पुढे जाऊ शकतं असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
दुसरीकडे गिलगिट बाल्टिस्थान, लडाख, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
गुजरात, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान सध्या देशावर दुहेरी संकट पहायला मिळत आहे, एकीकडे उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार आहे, तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.