Friday, June 27, 2025
Homeमहाराष्ट्रबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! निकालाची तारीख बदलली, आता कधी लागणार रिजल्ट?

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! निकालाची तारीख बदलली, आता कधी लागणार रिजल्ट?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपण्यास अजून थोडा वेळ लागणार आहे. आधी अपेक्षित असलेला निकाल आता थोडा उशीराने, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार आहे.

 

फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या इयत्ता 12वी (HSC) च्या परीक्षांचे निकाल सुरुवातीला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता ही तारीख थोडी पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल आता मेच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजे 10 ते 15 मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

दहावीच्या निकालाची तारीखही जवळपास निश्चित करण्यात आली असून तो 15 मे 2025 पर्यंत जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी निकाल लवकर जाहीर केला जात असल्याचेही बोर्डाकडून सांगण्यात आले.

 

विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35% गुण आवश्यक आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवरून खालीलप्रमाणे श्रेणी दिली जाणार आहे:

 

विद्यार्थी आपला निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतील:

 

निकाल पाहण्याची प्रक्रिया:

 

अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा

 

‘Maharashtra SSC/HSC Result 2025’ लिंकवर क्लिक करा

 

तुमचा सीट नंबर आणि आवश्यक माहिती भरा

 

सबमिट बटनावर क्लिक करा

 

तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल

 

निकालाचा प्रिंटआउट किंवा PDF सेव्ह करून ठेवा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -