भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करुन भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि 400 ड्रोनचा वापर करुन 36 ठिकाणी हल्ला केला. पाकिस्तानने या हल्ल्यासाठी तुर्कीच्या ड्रोनचा वापर केला. पाकच्या या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिलं अशी माहिती परराष्ट्र खात्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी ही पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा रडीचा डाव उघडा पाडला.
पाकिस्तानकडून धार्मिक ठिकाणे लक्ष्य
पाकिस्तानने एका ख्रिश्चन शाळेला आणि गुरुद्वाराला लक्ष्य केलं. ख्रिश्चन शाळेवर केलेले्या हल्ल्यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तुर्कीच्या ड्रोनच्या माध्यमातून भारतावर हल्ला
पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आणि 400 ड्रोनच्या सहाय्याने 36 ठिकाणी हल्ले केले. त्यापैकी बहुतांश ड्रोन भारतीय सेनेने पाडलं. इतक्या मोठ्या ड्रोन हल्ल्याचा अर्थ असा होता की त्यांना भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद जाणून घ्यायची होती. हे ड्रोन तुर्कीचे होते. भारताने बहुतेक ड्रोन नष्ट केले.
पाकिस्तानच्या सशस्त्र UAV ने भंटिडा सैन्य तलाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तो निष्क्रिय करण्यात आला. पाकिस्तानमध्ये चार हवाई रक्षण यंत्रणांवर हल्ले करण्यात आले, त्यात एक यंत्रणा उद्धवस्त करण्यात आली.
उरी, पुंछ, राजौरी, उधमपूर यासह इतर ठिकाणी ड्रोन आणि गोळीबारी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. यामुळं भारतीय सैन्याचे काही जवान जखमी झाले. पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात त्यांचं नुकसान झालं.
पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर
पाकिस्तान साडे आठ वाजता ड्रोन आणि मिसाईल हल्ला केल्यानंतर नागरी हवाई क्षेत्र बंद केलं नाही. नागरी विमानांना ते ढाल म्हणून वापर करत आहेत.
पाकिस्तानने भारताची वायू हद्द ओलांडली. त्यावेळी भारताकडून चार ड्रोनच्या माध्यमातून प्रतिहल्ला करण्यात आला.