Thursday, June 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात पंचगंगा नदीला पूर; बंधाऱ्यावरील वाहतूक ठप्प, 142 गावांमध्ये झाले नुकसान

कोल्हापुरात पंचगंगा नदीला पूर; बंधाऱ्यावरील वाहतूक ठप्प, 142 गावांमध्ये झाले नुकसान

पश्चिम महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीला पहिल्यांदाच उन्हाळ्यामध्ये पूर आला. त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करावी लागली.

 

सध्या मान्सूनपूर्व सरी बरसत असून, सातारा, सांगलीसह सोलापूरमध्येही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यामध्ये सुमारे ११६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

मान्सूनपूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्यातील १४२ गावात नुकसान झाले आहे. अर्थात आर्थिक हानी होण्यासोबतच वीज पडून दोन व्यक्तींचा तर ५७ जनावरांचा मृत्यू झाला. तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालनुसार मे महिन्यात एकूण ८० घरांची पडझड झाली असून, १५५७शेतकऱ्यांचे ६३० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, आंबा यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.

 

राज्यात अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. अनेक भागात तर मुसळधार पाऊस होत असल्याने नदी, नाल्यांना पूर आले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात देखील मागील तीन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील पाणीपातळीत वाढ झाल्याने राजाराम बंधाऱ्यावर पाणी आले आहे. परिणामी बंधाऱ्यावरची वाहतूक बंद करण्यात आली होती.

 

दरम्यान, शुक्रवारी मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला. गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस रात्रीच्या वेळी दाखल होत आहे. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात देखील यलो अलर्ट दिला आहे.

 

पुणे-बंगळुरू मार्गावर वाहनांच्या रांगा

 

गेली चार दिवस सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे पडलेल्या खड्यांमुळे आणि महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहनधारकांना कोडीचा मोठा सामना करावा लागला. तर साताराकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या नागठाणे- बोरगाव या भागांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -