Wednesday, June 25, 2025
Homeब्रेकिंगदोघेही घराबाहेर पडले, पोहण्यासाठी पाण्यात उतरले अन् आक्रित घडलं; दोन सख्ख्या भावांचा...

दोघेही घराबाहेर पडले, पोहण्यासाठी पाण्यात उतरले अन् आक्रित घडलं; दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

पुण्यातील मावळ येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत पूल कोसळून पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेला १० दिवसही पूर्ण होत नाही तोवर भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

 

भिवंडी तालुक्यातील गोरसई येथे कामवरी नदीत दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सागर परशुराम धुमाळ (वय ३०) आणि अक्षय परशुराम धुमाळ (वय २५) असं बुडून मृत झालेल्या भावांची नावं आहेत. घटनास्थळी भिवंडी पालिका आपत्तीव्यवस्थापन तसेच अग्निशामक पथकाकडून दोघांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

फोटो काढताना तोल गेला अन् १६ वर्षीय वेदांत मुळा नदीत पडला

 

पुण्यातील दापोडी येथील पुलावरुन एक १६ वर्षीय मुलगा अचानक मुळा नदी पात्रात पडला. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड व खडकी कॅन्टोन्मेंट ॲम्युनिशन अग्निशमन दलाकडून अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी बोटीच्या सहाय्याने रशी आणि लाईफ जॅकेट वापरत अडकलेल्या मुलाची सुखरुप सुटका केली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत बोत्रे (वय १६) असे मुळी नदी पात्रात पडलेल्या मुलाचे नाव आहे. वेदांत हा दापोडी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा दर्शनासाठी आला होता. त्यादरम्यान मुळा नदीच्या पुलावर उभा असताना वेदांतचा तोल गेला आणि तो नदीपात्रात कोसळला. वेदांत पालखीचा फोटो काढण्यासाठी पुलावर गेला असताना ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.

 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी तो नदीच्या पुलावर गेला होता. वेदांत फोटो स्टंट करण्याकरता गेला असता तोल जाऊन पुलावरुन नदीपात्रात पडल्याचे म्हटले जात आहे. मुळा नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता. तसेच नदीपात्रात पूल बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या कॉलममध्ये वेदांत पडला होता. त्यामुळे त्याला पाण्यातून बाहेर काढणे कठीण होते.

 

या प्रकरणाची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने मोटरबोटीने लगेच नदीपात्रात उतरुन वेदांत बोत्रेचे प्राण वाचवले आणि त्याला आईवडिलांच्या स्वाधीन केले. गौतम इंगवले, विकास नाईक, रुपेश जाधव, प्रथमेश भोसले, विशाल चव्हाण, आविष्कार पिराळ आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून वेदांतचा जीव वाचवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -