Wednesday, June 25, 2025
Homeकोल्हापूरगुलाल,ना फटाक्यांचा आव्वाज..! कोल्हापुरातील 22 ग्रामपंचायतींना निवडणुकांची प्रतीक्षा

गुलाल,ना फटाक्यांचा आव्वाज..! कोल्हापुरातील 22 ग्रामपंचायतींना निवडणुकांची प्रतीक्षा

कोल्हापूर जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे या 22 ग्रामपंचायतील गावगाड्यांचे राजकारण थांबले आहे. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून या 22 ग्रामपंचायतीचा कारभार अधिकाऱ्यांच्या हातात आहे.

 

त्यांच्याकडूनच कारभार सुरू आहे. अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) निवडणुकांबाबत कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे अजून काही महिने यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे त्यानंतर काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने त्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा अडकली. म्हणून या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया रखडली.

 

याबाबत जिल्हा निवडणूक विभागाकडून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसंदर्भात (Gram Panchayat) राज्य निवडणूक आयोगाला कळविले. परंतु, निवडणुका झाल्या नसल्याने या ग्रामपंचायतींचा कारभार सुरू ठेवण्यासाठी प्रशासक नेमणे क्रमप्राप्त होते.

 

गेल्या सहा महिन्यांपासून या ठिकाणी प्रशासकच कारभार करत आहेत. जिल्हा निवडणूक विभागाकडूनही मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत निवडणूक आयोगाला कळविले आहे. परंतु, गेल्या सहा महिन्यांत कोणतेही निर्देश आयोगाकडून आलेले नाहीत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे कारभारी हे प्रशासक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे थोडे दुर्लक्ष झाले आहे.

 

या ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासकराज’

 

बोरपाडळे, काळजवडे, पिसात्री, वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा), आलतुर, भेंडवडे, चांदोली-घोळसवडे, पुसार्ले (ता. शाहूवाडी), आगर, टाकळी (ता. शिरोळ), केर्ले (ता. करवीर), चौंडाळ, सावर्डे खुर्द, सुरुपली (ता. कागल), निळपण (ता. भुदरगड), मजरे कारवे, मौजे कारवे, कामेवाडी (ता. चंदगड), अत्याळ, हणमंतवाडी, नांगनूर, तनवडी (ता. गडहिंग्लज).

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -