Saturday, July 12, 2025
Homeमहाराष्ट्रजय शिवराय! शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश, वाचा यादी

जय शिवराय! शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश, वाचा यादी

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल 12 किल्ल्यांना जागतीक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ जिंजी- या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक हेरिटेज दर्जा मिळाला- आज पॅरिसमध्ये झालेल्या मतदान पार पडलं त्यात निर्णायक बहुमत मिळवत राजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालं.

 

सुमारे दीड वर्षांपूर्वी या किल्ल्यांचं वर्ल्ड हेरिटेज साइटसाठी नॉमिनेशन झालं होतं. आज फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे वारसास्थळात किल्ल्यांचा समावेश व्हावा यासाठी मतदान पार पडले. त्यावेळी अनेक देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले आणि महाराजांच्या किल्ल्यांना बहुमान प्राप्त झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

 

जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेले किल्ले

या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्यातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यामध्ये स्वराज्याची राजधानी रायगड, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, महाराजांनी ज्या किल्ल्यावर अफजलखानाला नेस्तनाबूत केले तो प्रतापगड, राजाचं जन्मस्थान शिवनेरी, स्वराज्याच्या नौदलाचं प्रमुख केंद्र जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाता पायांचे ठसे आहे तो सिंधुदुर्ग,लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी (महाराष्ट्र) आणि जिंजी (तामिळनाडू) यांचा समावेश होता.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील किल्ले हे स्वराज्याच्या इतिहासाचे साक्षी आहेत. शिवराय, शंभुराजेंच्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावत या किल्ल्यांचे रक्षण केले आहे. अनेक किल्ले तर शत्रुंच्या ताब्यातून जिंकले आहे. हे किल्ले राजांच्या मावळ्यांच्या शौर्यांची गाथा सागणारे आहेत. आणि आज या किल्ल्यांना जगातील वारसा स्थळात स्थान मिळाल्याने जगभर या किल्ल्यांचा डंका वाजणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -