कोकण, मराठवाडा, विदर्भात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या मंगळवारपासून पुढील ४ दिवस वादळी पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला असून मान्सून आता गुजरातमधील कच्छ भागापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा २४ तासांत तयार होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. परिणामी राज्यातील अनेक भागात मुसळदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात यलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे
.