Thursday, February 6, 2025
Homeक्रीडाकांगारुंच्या भूमीत बुमराहच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद, चौथ्या कसोटीतच मिळवला मान

कांगारुंच्या भूमीत बुमराहच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद, चौथ्या कसोटीतच मिळवला मान

मेलबर्न कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने 105 धावांच्या आघाडीसह पुढे खेळण्यास सुरुवात केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमवून 228 धावा केल्या. नाथन लियॉन नाबाद 41, तर स्कॉट बोलँड नाबाद 10 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एकूण 333 धावा झाल्या आहेत.

 

जसप्रीत बुमराहने या कसोटी सामन्यात एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 4 विकेट घेतल्या आहेत. यासह जसप्रीत बुमराहने 4 सामन्यात एकूण 29 विकेट नावावर केल्या आहेत.

 

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील एका पर्वात सर्वाधिक विकेट घेण्याचा मान जसप्रीत बुमराहाला मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बेन हिल्फेनहॉसच्या नावावर होता.

 

2011-12 बॉर्डर-गावस्कर मालिकेत बेन हिल्फेनहॉसने 4 सामन्यात 1008 चेंडूत एकूण 27 विकेट घेतल्या होत्या. बॉर्डर-गावस्कर हे ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर कसोटी मालिकेतील एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.

 

आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हा 12 वर्षे जुना विक्रम मोडण्यात यश मिळवले आहे. या मालिकेत बुमराहने 4 सामन्यात 778* चेंडू टाकले आहेत आणि 29* बळी घेतले घेतले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -