वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा, मुलगी जन्मली तर ती ‘नकोशी’ अशा बुरसटलेल्या मानसिकतेतून कोल्हापूरकर बाहेर पडले आहेत. स्त्री भ्रूणहत्येच्या घटनांमुळे राज्यात डेंजर झोनमध्ये गेलेल्या कोल्हापुरात आता मुलीच्या जन्माचे जल्लोषी स्वागत केले जात आहे.
2011 मध्ये दरहजारी 881 पर्यंत खाली गेलेला मुलींचा जन्मदर जनजागृती, बदलत्या मानसिकतेमुळे 932 पर्यंत वाढला आहे.
करवीर, राधानगरी, गगनबाडा, आजरा तालुक्यातील चित्र गंभीर आहे. या तालुक्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. मुलगाच हवा या अट्टहासामुळे गर्भातच कळ्या खुडल्या गेल्या. तालुका, गाव पातळीवरील आणि आडमार्गावरील सोनोग्राफी केंद्रे, व्हॅनमध्येच सोनोग्राफी उपकरण घेऊन केले जाणारे गर्भलिंग निदान आणि त्यापेक्षाही कर्नाटक सीमेलगतच्या केंद्रांवरील एजंटांचा सुळसुळाट यामुळेच मुलींचा जन्मदर कमी होत गेला. कोल्हापुरात अनेक स्त्री भ्रूणहत्येची अनेक प्रकरणे उघडकीस आली. आरोग्य विभाग, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांनी यांच्या विरोधात चळवळ उभा केली. जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन प्रबोधनाची मोहीम राबविली. शासनानेदेखील मुलींचे स्वागत करण्यासाठी विविध योजनांना पाठबळ दिले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा टक्का वाढतोय