Thursday, June 26, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस असे राहणार वातावरण, धरणांतील अशी आहे स्थिती

कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस असे राहणार वातावरण, धरणांतील अशी आहे स्थिती

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर पुढील दोन दिवसही हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता, परंतु आज पावसाने पूर्णपणे उघडीप दिली.

 

दिवसभरात ढगाळ वातावरण व ऊन असे वातावरण राहिले. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

 

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांकडून वातावरणाचा अंदाज घेत पुन्हा पेरणीची कामे सुरू करण्यात आली. दिवसभरात काही काळ ढगाळ वातावरण व काही काळ ऊन पडले, तर दिवसभरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

 

यामध्ये राधानगरी धरणातून १५०० क्युसेक, तुळशी धरणातून ३०० क्युसेक, दूधगंगा धरणातून ७०० क्युसेक, घटप्रभा धरणातून ४०० क्युसेक, कासारी धरणातून २५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

 

दरम्यान, आज दुपारी चार वाजता दूधगंगा धरणाच्या विद्युत गृहातून क्युसेक विसर्ग सोडला आहे. तो टप्प्याटप्प्याने वाढवून १५०० क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, तरी नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -